घरगणेशोत्सव २०१९कोकणात गणपतीसाठी रेल्वेगाडया प्रकरण,महाराष्ट्र सरकारकडून अलार्म चैनपुलिंग, खापर रेल्वेवरच!

कोकणात गणपतीसाठी रेल्वेगाडया प्रकरण,महाराष्ट्र सरकारकडून अलार्म चैनपुलिंग, खापर रेल्वेवरच!

Subscribe

मध्य रेल्वेने गुरुवारी प्रसिद्ध पत्रक जारी करुन रेल्वे प्रशासन कोकणासाठी विशेष गाड्या चालविण्यासाठी सज्ज असून राज्य सरकारच्या अंतिम मंजुरीची प्रतिक्षा करीत असल्याचे स्पष्ट केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सावासाठी कोकणात ट्रेन सोडण्यासाठी मध्य रेल्वेनी राज्य सरकारला पत्र लिहून मत विचारले होते. त्या पत्रावर राज्याचे आपत्ती व्यवस्थापन युनिटचे संचालक यांनी रेल्वेचा पत्राला उत्तर देत कोकणात गाडया सोडण्याचे नियोजन करु शकता असे उत्तर दिले. मात्र प्रत्येक्षात गाड्या सोडण्याची घोषना झाली नाही. रेल्वे आणि राज्य सरकारमधील वादामुळे चाकरमानी संभ्रमात पडले होते. मात्र आता मध्य रेल्वेने गुरुवारी प्रसिद्ध पत्रक जारी करुन रेल्वे प्रशासन कोकणासाठी विशेष गाड्या चालविण्यासाठी सज्ज असून राज्य सरकारच्या अंतिम मंजुरीची प्रतिक्षा करीत असल्याचे स्पष्ट केले आहे.

२३ जुलै 2020 रोजी मध्य रेल्वेने दिलेल्या पत्राद्वारे राज्य सरकारला महाराष्ट्रात कोकणात जाणा-या गणपती विशेष रेल्वे गाड्या कशा चालवायच्या,  त्यांची संख्या आणि तारीख याबाबत  त्यांची मते विचारली होती. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन युनिटचने  संचालक अभय यावलकर यांनी गणपती महोत्सवासाठी कोकणात विशेष गाड्या नियोजित केल्या जाऊ शकतात असे पत्राद्वारे कळवले.त्यानंतर युध्दस्तरावर मध्य रेल्वेने विशेष गाड्यांचे वेळापत्रक तयार केले आणि रेल्वे बोर्डाकडे मान्यतेसाठी पाठविले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे बोर्डाने गृह मंत्रालय आणि महाराष्ट्र राज्य शासनाच्या आंतरजिल्हा प्रवासाच्या मानदंडांच्या मानक संचालन प्रक्रिया (एसओपी) च्या अधीन असलेल्या विशेष गाड्या चालवण्यास तत्काळ ९ ऑगस्ट.२०२० रोजी मान्यता दिली आहे.सोशल डिस्टंसिंग  इत्यादी सर्व नियमांच्या अधीन राहून  विशेष रेल्वेगाड्या चालविण्यास रेल्वे तयार आहे, तथापि, महाराष्ट्र राज्य शासनाच्या वरिष्ठ अधिका-यांनी शनिवारी ८ ऑगस्ट रोजी रात्री दूरध्वनीवरून विशेष गाड्यांच्या चालविण्याचे वेळापत्रक थांबून ठेवण्यास सांगितले. ही बाब महाराष्ट्र शासनाच्या विचाराधीन असून त्याच्या विषयी लवकरच सल्ला दिला जाईल असे त्यांनी सांगितले. तेव्हापासून रेल्वे प्रशासन,  बोर्ड आणि झोनल स्तरावरून  महाराष्ट्र सरकारच्या अधिका-यांशी सातत्याने संपर्कात आहे आणि पुढे जाण्याची वाट पहात आहेत.अशी अधिकृत माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने केली आहे.

- Advertisement -

आता गाड्या सुटणे अशक्य

अवघ्या ९ दिवसांवर गणेशोत्सव येउन ठेपला आहे. तसेच विलगीकरणाचा कालावाधी पाहता कोकणात रेल्वेच्या विशेष गाड्या सुटु शकणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मात्र गणेशोत्सव संपल्यानंतर कोकणातून येणार्‍यांसाठी तरी गाडयांचे नियोजन होऊ शकते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -