घरदेश-विदेशलग्न आटोपून निघालेल्या गाडीला अपघात; ६ मुले बेपत्ता

लग्न आटोपून निघालेल्या गाडीला अपघात; ६ मुले बेपत्ता

Subscribe

गाडीमधील पुरुष आणि महिलेला सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. मात्र अजूनही ६ मुले बेपत्ता आहेत.

उत्तर प्रदेशात लग्न आटोपून निघालेल्या गाडी लखनऊमधील इंदिरा तळ्यात पडली. या गाडीत १५ से १६ लोक होते. यामध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश होता. माहितीनुसार या घटनेतील ६ मुले पाण्यात वाहून गेली आहेत. एनडीआरएफची पथक मुलांचा शोध घेत आहेत.

- Advertisement -

लखनऊ येथील पटवा गावाजवळील ही घटना आहे. एनडीआरएफचे पथक आणि पोलिसांकडून बचावकार्य सुरुच आहे. ही गाडी बाराबंकी येथील कटरा येथे जाताना, या गाडीला अपघात झाला. गाडीमधील पुरुष आणि महिलेला सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. परंतू, ६ मुले बेपत्ता आहेत. ही घटना रात्रीची घडली, असे सांगितले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -