घरताज्या घडामोडीअक्षया आणि सुयश यांचा झाला ब्रेकअप?

अक्षया आणि सुयश यांचा झाला ब्रेकअप?

Subscribe

अक्षया देवधर आणि सुयश टिळक यांचा ब्रेकअप झाल्याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे.

सिनेसृष्टीतील कलाकारांच्या जोड्या, रिलेशनशिप्स, लग्न, घटस्फोट आणि ब्रेकअप नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. त्यातच सध्या एका खास अशा मराठमोठ्या कपलच्या ब्रेकअपची चर्चा सुरु आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत रसिकांच्या मनावर राज्य गाजवणाऱ्या पाठक बाई म्हणजे अक्षया देवधर आणि ‘का रे दुरावा’ मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता जय म्हणजेच सुयश टिळक. या दोघांचा ब्रेकअप झाल्याचे बोले जात आहे. सध्या सोशल मीडियावर यांच्या ब्रेकअपची चांगलीच चर्चा रंगली आहे.

यामुळे आले चर्चेला उधाण

या मराठी क्यूट कपलचे गेल्या काही वर्षांपासून अफेर होते. त्यांनी आपल्या नात्याविषयी कधीच मनमोकळेपाणाणे कबुली दिली नसली तरी सोशल मीडियावर त्यांची चांगलीच चर्चा रंगली होती. तसेच सुशय आणि अक्षया हे मराठी सिनेसृष्टीतील खास कपल म्हणून ओळखले जात होते. पण, सध्या या दोघांच्या नात्यात काही तरी बिनसले असल्याचे म्हटले जात आहे. कारण इन्स्टाग्रामवर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत छान-छान कॅप्शन लिहिणाऱ्या अक्षया आणि सुयश यांनी एकमेकांना अनफॉलो केल्याचे समजत आहे. तर सुयशने त्याच्या अकाऊंटवर अक्षयासोबतचे अनेक फोटो देखील डिलीट केले आहेत.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी अक्षयाने इन्स्टाग्रामवर सुयशसोबतचा एक फोटो शेअर करताना त्याखाली ‘मिसिंग यू लव्ह’, असे लिहिले होते. तर सुयशने ‘मिस यू टू’ देखील लिहिले होते. त्यामुळे या दोघांमध्ये काहीतरी खिचडी शिजत असल्याचा अंदाज चाहत्यांना आला होता. तर दोघांचे एकत्र दिसणे फिरणे हे चाहत्यांसाठी काही नवीन नव्हते. मात्र, आता या दोघांमध्ये दुरावा आल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून दोघांनी सोशल मीडियावर कोणतीच माहितीही शेअर केली नाही. यावरुन दोघांचे ब्रेकअप झाल्याचेही तर्कवितर्क लावले जात आहे. पण, त्यांच्यात नेमके काय घडले याबाबत दोघांचेही मौन कायम आहे.


हेही वाचा – ‘त्या’ Whatsapp चॅटवर दीपिकाने दिला कबुलीजबाब; अडचणीत होणार वाढ?


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -