घरमहाराष्ट्रघर बुडालं तर आक्रोश होणारच कोणीही राजकारण करत नाही

घर बुडालं तर आक्रोश होणारच कोणीही राजकारण करत नाही

Subscribe

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा टोला

आक्रोश होणे स्वाभाविकच आहे. माझे घर बुडाले तर आक्रोश होणारच ना. पण धीर तर धरावाच लागेल. धीर धरा. सगळा देश तुमच्यासोबत आहे. यात कुणीही राजकारण करत नाही, अशा भावना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंगळवारी येथे व्यक्त केल्या. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज पूरग्रस्त महाड, चिपळूणचा दौरा केला. या दौर्‍यानंतर राज्यपालांनी स्थानिकांना धीर देताना आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या. २३ जुलै रोजी महाड, चिपळूणसह संपूर्ण कोकण किनारपट्टीला पावसाने झोडपून काढले होते. त्यामध्ये चिपळूणला पावसाचा सर्वाधिक फटका बसला होता. शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती.

नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी चिपळूणला भेट दिल्यानंतर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी देखील चिपळूणला भेट दिली. यावेळी स्थानिकांनी आपले गार्‍हाणे राज्यपालांसमोर मांडल्यानंतर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. झालेल्या नुकसानानंतर स्थानिक आक्रोश करत असल्याचे सांगताच राज्यपाल म्हणाले की, आक्रोश होणे स्वाभाविकच आहे. माझे घर बुडाले, तर आक्रोश होणारच ना. पण धीर तर धरावाच लागेल ना. धीर धरा. सगळा देश तुमच्यासोबत आहेच. यात कुणीही राजकारण करत नाही आहे.

- Advertisement -

यावेळी स्थानिक चिपळूणवासीयांशी बोलताना राज्यपालांनी त्यांना धीर दिला. राज्यपाल म्हणून मी एवढेच सांगेन की खुद्द राष्ट्रपतींनी चिंता व्यक्त केली आहे. पंतप्रधान देखरेख करत आहेत. तुमचे मुख्यमंत्री देखील भेटून गेले. इथले मंत्री आणि खासदार देखील आहेत. मी देखील यासाठीच आलो की प्रत्यक्ष पाहाता यावे. तुमचे जेवढे नुकसान झाले, ते पाहून तुमचेच नाही, आमच्याही डोळ्यात अश्रू आले आहेत. माणसे लावली जात आहेत, बाहेरून येत आहेत. केंद्राकडून देखील मदत पाठवली जाईल. राज्य सरकार देखील मदत करेल. आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत, असे राज्यपाल म्हणाले.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -