घरमुंबईआदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात थ्री-डी मॅपिंगचा ढोल, संपूर्ण मुंबईत खड्ड्यांचा झोल - शेलार

आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात थ्री-डी मॅपिंगचा ढोल, संपूर्ण मुंबईत खड्ड्यांचा झोल – शेलार

Subscribe

मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मुंबई महापालिकेतील सत्ताधारी पक्ष शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. “वरळीमध्ये थ्रीडी मॅपिंगचा ढोल आणि संपूर्ण मुंबईत मात्र खड्डे लपवायचे झोल. वरळी आणि कलानगर सोडून मुंबई आहे हे शिवसेनेला व महापौरांना मान्य आहे का?” असा सवाल शेलार यांनी केला. आशिष शेलार यांनी आज पत्रकारपरिषदेतून शिवसेना व मुंबई मनपावर जोरदार टीका केली.

मुंबईतील खड्ड्यांच्या मुद्यावरुन पत्रकारपरिषद घेत शेलार यांनी जोरदार टीकास्त्र डागलं. मुंबई महापालिका रोज जणूकाही हसवणुकीची स्पर्धा घ्यावी, अशा पद्धतीची माहिती समोर आणत आहे. पालिकेच्या पोर्टलवर बीएमसी पाथहोल ट्रॅकिंग सिस्टिम आहे. या ट्रॅकिंग सिस्टिममध्ये संपूर्ण मुंबई शहरात ९०० च खड्डे आहेत, असं पालिकेने म्हटलं आहे. पोर्टलवर मुंबई शहरातील जे तक्रारदार माहिती देत आहेत. ते फोटो काढतात, त्याबाबतची माहिती, पत्ता ही सर्व माहिती अपलोड करताता. मात्र, मनपा जेव्हा स्वतः ट्रॅकिंग करते तेव्ही देखील ९०० च खड्डे असतात आणि नागरिक तक्रार करतात तेव्हा देखील संपूर्ण मुंबईत ९२७ खड्डे असल्याचंच सांगितलं जातं. या पेक्षा हास्यास्पद काय असणार? आणि म्हणून एकाबाजूला मनपा वरळीमध्ये थ्रीडी मॅपिंग करते. म्हणून आमचं म्हणणं आहे की वरळीमध्ये थ्रीडी मॅपिंगचा ढोल आणि संपूर्ण मुंबईत मात्र खड्डे लपवायचे झोल. हे धंदे शिवसेनेचे आहेत, अशी घणाघाती टीका आशिष शेलार यांनी केली.

- Advertisement -

महापौरांवर निशाणा

आशिष शेलार यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना लक्ष्य केलं. मुंबईचे संपूर्ण क्षेत्रफळ तुमच्या डोळ्यासमोर कधी असतं का? संपूर्ण मुंबईचा नकाशा विकासासाठी कधी तुम्ही पाहता का? असा सवाल शेलार यांनी केला. पुढे बोलताना शेलार यांनी म्हटलं की, नवीन फूटपाथला रिलिंग द्यायची तर अगोदर वरळी, वाहतूक सिग्नलसाठी अद्यावत दिवे द्यायचे असतील तर आधी वरळी, संपूर्ण मुंबईत मोठ्याप्रमाणात पूल आहेत, पण पूलाच्या खाली सुशोभिकरण करायचं असेल, तर वरळी. आता थ्रीडी मॅपिंग करायचं आहे, तर ते देखील वरळी. कोविडच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांसाठी आयसीयू सेंटर बनवायचं आहे तर वरळी आणि त्या पलिकडे पाणी तुंबतं म्हणून पाण्याचा निचरा करायचा असेल, तर वरळीवरून थेट कलानगर सिग्नल. मग त्या कलानगर सिग्नलला असंख्य पंप, असं म्हणत शेलार यांनी महापैर केवळ वरळी आणि कलानगरमध्येच कामं करतात असा आरोप केला.

तसंच, वरळी आणि कलानगर सोडून मुंबई आहे, त्याचं अस्तित्व आहे. हे शिवसेनेला व महापौरांना मान्य आहे का? असा सवाल शेलार यांनी केला.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -