घरपालघरभीषण पाणीटंचाईमुळे वाडा शहर तहानलेले!

भीषण पाणीटंचाईमुळे वाडा शहर तहानलेले!

Subscribe

वाडा शहरातील नागरिक पाणी समस्याने त्रस्त झाले असून त्यांनी एक दिवसाआड अंघोळीचा पर्याय निवडला आहे. तरीदेखील याचे लोकप्रतिनिधींना काहीही सोयरसुतक नाही, असे चित्र दिसत आहे.

वाडा शहरातील नागरिक पाणी समस्याने त्रस्त झाले असून त्यांनी एक दिवसाआड अंघोळीचा पर्याय निवडला आहे. तरीदेखील याचे लोकप्रतिनिधींना काहीही सोयरसुतक नाही, असे चित्र दिसत आहे. वाडा शहराची लोकसंख्या ४० हजाराहून अधिक असून दिवसेंदिवस वाढतच आहे. शहराला प्रामुख्याने वैतरणा नदीतील सिद्धेश्वर बंदाऱ्यातून पाणीपुरवठा केला जातो. या ठिकाणी मुबलक पाणी आहे. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीतही भरपूर पाण्याची साठवणूक होत आहे. या साठ्यातून शहरातील इतर नगरांना पाणीपुरवठा सुरळीत होतो. मात्र शिवाजी नगर, शास्त्री नगर, विवेक नगर, सोनार पाडा, शांती नगर, समथॅनगर, विष्णुनगर या नगरातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. येथील नागरिकांना टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे.

नगर पंचायतीकडे वेळोवेळी अर्ज, विनंत्या करूनही नेहमीच तांत्रिक कारणे देत दोष दूर करु, लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी आश्वासने दिली जातात. मात्र त्याची पूर्तता केली नसल्याने ही पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
– दामोदर पाटील, शिवाजी नगर, रहिवाशी

- Advertisement -

या संदर्भात येथील सामाजिक कार्यकर्ते बंड्या सुर्वे यांनी सांगितले की, वाडा शहराची वस्ती वाढल्याने नगरांची संख्याही प्रचंड वाढली आहे. त्यामुळे जुनी पाणी योजना वाढत्या लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यास अपुऱ्या पडत आहेत. त्याकरता प्रत्येक नगरासाठी टाकीपासून स्वतंत्र पाईपलाईन टाकायला हवी. परंतु नगरपंचायत प्रशासनावर लोकप्रतिनिधींचा अंकुश नसल्याकारणाने वाडा शहरात पाणीटंचाई जाणवत आहे. पाणीटंचाईमुळे येथील नागरिकांनी आंघोळीला रामराम ठोकला आहे. तर आजूबाजूच्या खेड्यातून नोकरीनिमित्त वाड्यात राहायला आलेल्या रहिवाशांनी वाड्यातील घरे सोडून गावाकडे मुक्कामाला जाण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा –

संजय राऊतांसाठी अनुशासनची ऐशी की तैशी करु, आशिष शेलारांचा शिवसेनेला इशारा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -