घरमहाराष्ट्रसरन्यायाधीश म्हणाले, ...तरीही सरकार पडलंच असतं!; उद्या पुन्हा सुनावणी

सरन्यायाधीश म्हणाले, …तरीही सरकार पडलंच असतं!; उद्या पुन्हा सुनावणी

Subscribe

जर विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांना अपात्र ठरवले असते तर त्यांना मुख्यमंत्री बनण्याची व सरकार स्थापन करण्याची संधीच मिळाली नसती. नबाम रेबिया प्रकरणाच्या निकालाने विधानसभा अध्यक्षांना अपात्रतेची कारवाई करण्यापासून रोखले नसते तर कदाचित ते ३९ आमदार अपात्र ठरले असते आणि महाविकास आघाडीचे सरकार कोसळलेच असते, असेही सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी नमूद केले.

 

नवी दिल्लीः जर विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेच्या ३९ आमदारांना अपात्र ठरवलं असतं तरी महाविकास आघाडीचे सरकार पडलचं असतं, असे निरीक्षण सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी आज व्यक्त केले. बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व समर्थक आमदारांकडून सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करण्यात आला. यावरील पुढील सुनावणी गुरुवारी होणार आहे.

- Advertisement -

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सुनावणी सुरु आहे. त्यात सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी वरील मत व्यक्त केले. जर विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांना अपात्र ठरवले असते तर त्यांना मुख्यमंत्री बनण्याची व सरकार स्थापन करण्याची संधीच मिळाली नसती. नबाम रेबिया प्रकरणाच्या निकालाने विधानसभा अध्यक्षांना अपात्रतेची कारवाई करण्यापासून रोखले नसते तर कदाचित ते ३९ आमदार अपात्र ठरले असते आणि महाविकास आघाडीचे सरकार कोसळलेच असते, असे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी नमूद केले.

२१ जून २०२२ रोजीच शिवसेनेत दोन गट पडले होते. तसेच आम्ही अशी एक न्यायिक पद्धत तयारी केली आहे, ज्यामध्ये न्यायाधीशांची नियुक्ती चुकीची ठरली तरी त्याचा त्यांनी दिलेल्या निकालावर परिणाम होत नाही, असे मत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या समर्थकांकडून ज्येष्ठ वकील निरज कौल यांनी बुधवारी युक्तिवाद केला. आमचा विरोध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नव्हता. आमचा महाविकास आघाडीला विरोध होता. त्यामुळेच आम्ही सत्तेतून बाहेर पडलो.  २५ जून २०२२ रोजी ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिले. शिवसेनेतून एक गट फुटला आहे. हा गट पक्ष चालवू शकतो. आम्हीच खरी शिवसेना आहोत, असे ठाकरे गटाने पत्रात नमूद केले होते, असे ज्येष्ठ वकील कौल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले.

तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगितले होते. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका करण्यात आली होती. बहुमत चाचणी झाली तरी न्यायालयाच्या अंतिम निकालावर त्या चाचणीचे भवितव्य अवलंबून असेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. तरीही उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेले नाहीत.  मुख्यमंत्री कसे सांगू शकतात की मी बहुमत चाचणीला सामोरा जाणार नाही, असा युक्तिवाद ज्येष्ठ वकील कौल यांनी केला. यावरील पुढील सुनावणी उद्या गुरुवारी होणार आहे.

 

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -