घरलोकसभा २०१९औरंगाबादची जागा घ्या, अहमदनगरची जागा सोडा

औरंगाबादची जागा घ्या, अहमदनगरची जागा सोडा

Subscribe

काँग्रेसचा राष्ट्रवादी काँग्रेसला प्रस्ताव

अहमदनगरच्या बदल्यात औरंगाबादची जागा घ्या, असा प्रस्ताव काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसला देऊन नगरच्या जागेचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न काँग्रेसने सुरू केला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांना अहमदनगरच्या जागेवरुनच लोकसभा निवडणूक लढवायची आहे. तर औरंगाबादच्या जागेसाठी आग्रही असलेली राष्ट्रवादी काँग्रेस अहमदनगरची जागा सोडण्यास मात्र तयार नाही. दुसरीकडे सुजय विखे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन अहमदनगरच्या जागेवर लोकसभा निवडणूक लढवण्याची चर्चा रंगली होती. परंतु सुजय विखे पाटील यांची राष्ट्रवादीमध्ये जाण्याची मानसिकता नाही. त्यामुळे औरंगाबाद आणि अहमदनगर या जागांची अदलाबदल करुन या मुद्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होत आहे.

अहमदनगर मतदारसंघात डॉ. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी राधाकृष्ण विखे पाटील मागील अनेक महिन्यांपासून प्रयत्न करत आहेत. परंतु विखे पाटील आणि पवार कुटुंबातील वैर यामुळे या जागेवर निर्णय झालेला नाही. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीने ही जागा काँग्रेससाठी सोडल्याची चर्चा सुरु होती. मात्र काँग्रेससाठी ही जागा सोडली नसल्याचे सांगत या जागेवर राष्ट्रवादीच लढणार असे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -