घरदेश-विदेश'या' दिवशी भारतात दाखल होणार चित्ते, तयार करण्यात आलाय विशेष अधिवास

‘या’ दिवशी भारतात दाखल होणार चित्ते, तयार करण्यात आलाय विशेष अधिवास

Subscribe

भोपाळ – देशातून लुप्त झालेल्या चित्ते 70 वर्षांनी परत येणार आहेत. मध्य प्रदेशच्या कुनो-पालपूर राष्ट्रीय अभयारण्यात 17 सप्टेंबरला चित्ते दाखल होणार असल्याचे मध्ये प्रदेशचे प्रधान मुख्य वन संरक्षक जे. एस चौहान यांनी सांगितले. यावेळी त्यांनी चित्यांना आफ्रिकी देश नामिबियातून राजस्थानच्या जयपूरमध्ये आणले जाणार आहे. त्यानंतर एका हेलिकॉप्टरद्वारे 17 सप्टेंबरला सकाळी कुनो-पालपूरमध्ये आणले जाणार असल्याचे सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबरला या चित्त्यांना जंगलात सोडणार आहेत. यासाठी विशेष अधिवास तयार करण्यात आला आहे. एक महिनाभर चित्त्यांना येथे ठेवले जाणार आहे. १९४८ मध्ये छत्तीसगढच्या कोरिया भागात रामगढच्या जंगलात महाराजा रामानुज प्रताप सिंहदेव यांनी देशातील अखेरचे तीन चित्ते मारले होते. १६ व्या शतकात देशात हजारो चित्ते होते. मात्र, राजा-महाराजांनी केलेल्या शिकारीमुळे चित्त्यांची संख्या कमी झाली. १९५२ मध्ये भारत सरकारने चित्त्याला विलुप्त प्रजाती घोषित केले. संपूर्ण जगात सध्या ७,००० चित्ते आहेत. यातील बहुतांश चित्ते आफ्रिकेच्या जंगलात आहेत.

- Advertisement -

आतापर्यंत काय घडले –

१९५५ मध्ये आंध्र सरकारच्या वन्य प्राणी बोर्डाने राज्याच्या दोन जिल्ह्यांत इराणहून दोन चिते भारतात आणण्याची सूचना केंद्र सरकारला केली होती. साठच्या दशकात केनिया सरकारने भारताला चित्ते देण्याची तयारी दर्शवली होती. त्यानंतर १९७० मध्ये भारत सरकारच्या पर्यावरण विभागाने इराण सरकारकडून चित्ते मिळविण्यासाठी चर्चा सुरू केली होती. मात्र, इराणमध्ये सत्ताबदल झाल्याने चर्चा ठप्प झाली.

- Advertisement -

ऑगस्ट २००९ मध्ये इराणने चित्ते पाठविण्याची तयारी दर्शवली होती. त्या बदल्यात त्या देशाला भारतातून एशियाटिक लॉयन पाहिजे होते. भारताने ही मागणी पूर्ण करण्यास नकार दिल्याने चर्चा पुन्हा ठप्प झाली. चित्त्यांच्या पुनर्प्रवेशासाठी मागील दशकात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थानसह १२ राज्यांत अध्ययन करण्यात आले. २०१२ मध्ये सुप्रीम कोर्टाने आफ्रिकी चित्ते आणण्यावर निर्बंध लादले होते. २०२० मध्ये ते निर्बंध हटविण्यात आले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -