घरदेश-विदेशArunachal Pradesh : अरुणाचल आमचेच... महिन्याभरात चौथ्यांदा दावा; चीनचे दावे बिनबुडाचे, भारताचे...

Arunachal Pradesh : अरुणाचल आमचेच… महिन्याभरात चौथ्यांदा दावा; चीनचे दावे बिनबुडाचे, भारताचे प्रत्युत्तर

Subscribe

नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेश आमचाच भूभाग असल्याचा दावा चीनने पुन्हा एकदा केला आहे. असा दावा करण्याची चीनची या महिन्यातील चौथी वेळ आहे. दरम्यान, देशाचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी चीनचा दावा फेटाळून लावल्यानंतर सोमवारी पुन्हा एकदा चीनने यासंदर्भात वक्तव्य केलं आहे.

अरुणाचल प्रदेश आमचाच – चीन

भारताचा अविभाज्य भाग असलेल्या अरुणाचल प्रदेशवर चीनने सोमवारी पुन्हा एकदा दावा केला आहे. अरुणाचल प्रदेश हा आमचाच भूभाग असल्याचं चीनने म्हटलं आहे. यापूर्वी बीजिंगकडून झालेला हा दावा ‘बिनबुडाचा’ आणि ‘हस्यास्पद’ असल्याचं सांगत भारताने तो फेटाळून लावला आहे. त्यानंतर पुन्हा सोमवारी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या प्रतिक्रियेवर मत नोंदवले. भारताच्या ईशान्येकडे असलेलं हे राज्य ‘भारताचा नैसर्गिक भाग’ असल्याचे भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी शनिवारी ठामपणे सांगितलं होतं. त्यानंतरही चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जिआन यांनी या भूभागावर चीनच्या दाव्याचा पुनरुच्चार केल्याने नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Pawar Vs Pawar : मोठा नेता महाशक्तीकडून हळूहळू संपवला जातोय, रोहित पवारांकडून अजितदादा लक्ष्य

बेकायदेशीररित्या ताबा मिळवलेला भाग

लिन यांनी केलेल्या दाव्यानुसार जंगनान (अरुणाचल प्रदेशला चीनने दिलेलं नाव) हा भारताने ‘बेकायदेशीररित्या ताबा’ मिळवलेला भाग असून पूर्वी तो चीनचाच भाग होता. चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने अरुणाचल प्रदेशवर कायमच चीनचा प्रभाव असल्याचा दावाही केला आहे. तर, भारताने 1987 मध्ये बेकायदेशीररित्या ताबा मिळवलेल्या भागाला ‘कथित अरुणालच प्रदेश’चे नाव दिले, असे चीनचे म्हणणे आहे. चीनची ही भूमिका कधीही बदललेली नाही’, असे लिन यांनी प्रतिक्रिया नोंदवताना म्हटलं.

- Advertisement -

चीनचे दावे बिनबुडाचे

जयशंकर यांनी सिंगापूरमधील नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूरच्या इन्स्टिट्यूट ऑफ साऊथ एशियन स्टडीज (आयएसएएस) एका व्याख्यानात अरुणाचल प्रदेशसंदर्भात भाष्य केलं. जयशंकर यांना अरुणाचलसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर, “हा काही नवा मुद्दा नाही. चीनने या प्रदेशावर दावा सांगितला आहे आणि ते पुन्हा पुन्हा त्याचा उल्लेख करत आहे. सुरुवातीला हे दावे बिनबुडाचे होते आणि आजही ते बिनबुडाचेच आहेत,” असं स्पष्टपणे सांगितलं होतं. “माझ्यामते आमची यावर फार स्पष्ट भूमिका आहे. आमची भूमिका कायम सारखीच राहिली आहे,” असंही जयशंकर म्हणाले होते.

हेही वाचा – Congress on PM Modi : …आणि मोदींनी काँग्रेसलाच भ्रष्टाचारमुक्त केलं; काय म्हणाले जयराम रमेश

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -