जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे सरपंच सज्जाद अहमद खांडे यांना दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार केले. त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. ते भारतीय जनता पक्षाशीही संबंधित होते. यापूर्वी जूनमध्ये काश्मिरी पंडित सरपंच अजय पंडित यांची हत्या करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी कुलगाम जिल्ह्यातील वेस्सु येथे असणाऱ्या घराच्या बाहेर सज्जाद यांच्यावर गोळ्या झाडल्या. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
#UPDATE Sarpanch Sajad Ahmad Khanday, who was fired upon by terrorists, succumbs to his injuries. #JammuAndKashmir https://t.co/HAHyAR3Zf2
— ANI (@ANI) August 6, 2020
काश्मीर खोऱ्यात ४८ तासांत सरपंचांवर हल्ला झाल्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी ४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी कुलगाम जिल्ह्यातील मीरबाजारच्या अखरण भागात पंच पीर आरिफ अहमद शाह यांच्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यावेळी ते गंभीर जखमी झाले होते, त्यानंतर त्यांना श्रीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
तसेच, ८ जून रोजी अनंतनाग जिल्ह्यातील लरकीपूरा भागातील सरपंच व कॉंग्रेस सदस्य अजय पंडित यांची त्यांच्या गावात हत्या करण्यात आली. यानंतर सुरक्षा दलांनी कारवाई करून सरपंच अजय पंडित यांच्या मारेकऱ्यांचा खात्मा केला असल्याचे सांगितले जात आहे.
धक्कादायक! कोरोनामुळे पतीचा मृत्यू; मुलांसह पत्नीनेही संपवले आयुष्य