घरमनोरंजनचाहत्यांकरिता शीतलीने लिहिला 'असा' भावूक मॅसेज

चाहत्यांकरिता शीतलीने लिहिला ‘असा’ भावूक मॅसेज

Subscribe

या मालिकेचा शेवट दुखः किंवा रटाळ न करता दिग्दर्शनकाने गोड या मालिकेचा शेवट गोडच केला.

“लागिर झालं जी” मालिका दोन वर्षापूर्वी म्हणजेच मे २०१७ मध्ये झी मराठीवर सुरू झाली होती. दोन वर्षात या मालिकेला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. नुकताच झी मराठी वाहिनीवरील “लागिर झालं जी” या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित करण्यात आला. काही काळासाठी अजिंक्य आणि शीतली प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण करून गेले. इतर मालिकेप्रमाणे या मालिकेचा शेवट दुखः किंवा रटाळ न करता दिग्दर्शनकाने गोड या मालिकेचा शेवट गोडच केला. मालिकेचा शेवट शीतलीने एका गोंडस बाळाला जन्म दिला असून शीतली देखील लष्करात भर्ती झालेली असते.

या काही शेवटच्या दोन भागात अजिंक्य अटारी बॉर्डरवरून परत येत असल्याने संपुर्ण गाव त्याचे उत्साहात स्वागत करण्यास सज्ज असते. अजिंक्य सैन्यात भरती झाल्यानंतर त्याला कोणतीही माहिती नव्हती अचानक घरी आल्यावर आपल्या बायकोला शीतलीला लष्करात भर्ती झाल्याचे पाहून तसेच आपल्या गोंडस बाळाला पाहून त्याला खूप आनंद होतो, असा काहिसा आनंदी शेवट करण्यात आला आहे.

- Advertisement -

मालिकेचा शेवटचा भाग झाल्यानंतर शीतलीने अर्थाच शिवानी बावकरने आपल्या चाहत्यांसाठी भावूक मेसेज सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ही पोस्ट लिहित असताना, “निरोप घेतोय पण तुमच्या काळजाच्या कोपऱ्यात नेहमीच राहू”, असा मॅसेज आपल्या चाहत्यांकरिता लिहिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -