सध्या संपूर्ण देशभरात दिल्लीतील महरौली परिसरात झालेला श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरण चर्चेत आहे. या धक्कादायक प्रकरणानंतर अनेकांचा थरकाप उडाला आहे. मुंबईमध्ये राहणारी आफताब अमीन पूनावाला नावाच्या मुलाने आपली प्रियसी श्रद्धा वालकरची गळा दाबून हत्या केली आणि त्यानंतर तिच्या मृत शरीराचे 35 तुकडे करुन छतरपूरमधील जंगलामध्ये वेग-वेगळ्या ठिकाणी फेकून दिले. ही विकृत घटना समोर आल्यानंतर प्रत्येकजण बिथरुन गेला आहे. दरम्यान, याच संदर्भात चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी ट्वीट केलं आहे.
राम गोपाल वर्मा यांचं ट्वीट
Instead of resting in PEACE she should come back as a spirit and cut him into 70 PIECES
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) November 16, 2022
Brutal murders can’t be prevented just by fear of law ..But they can be definitely stopped if the victims spirits come back from the dead and kill their killers ..I request God to consider this and do the needful 🙏🙏🙏
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) November 16, 2022
दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवरुन संताप व्यक्त केला आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिलंय की, “श्रद्धाचा आत्मा परत यायला हवा आणि त्याचे 70 तुकडे करायला हवे. या प्रकारच्या हत्यांना केवळ कायद्याच्या भीतीने रोकू शकत नाही. परंतु पीडित व्यक्तीचा आत्मा परत येऊन आणि हत्या करणाऱ्याला मारुन टाकेल कर नक्कीच हे थांबवले जाऊ शकेल. मी देवाकडे प्रार्थना करतो की, त्यांनी यावर नक्कीच विचार करावा”. राम गोपाल वर्मांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने देखील ट्वीट करत या हत्याकांडावर संताप व्यक्त केला होता.
काय आहे नेमकं प्रकरण
पोलिसांनी खुलासा करत सांगितलं की, आफताब मुंबईमधील एका कॉल सेंटरमध्ये काम करत होता. श्रद्धा आणि तो 2019 पासून लिव्हइनमध्ये राहत होते आणि यावर्षाच्या मध्यावर हे दोघे मुंबईहून दिल्लीला आले होते. लिव्हइनमध्ये राहिल्यानंतर श्रद्धा आफताबला लग्नाबाबत मागणी करत होती. त्यामुळे दोघांमध्ये वारंवार भांडण व्हायचे. आफताब अनेकदा श्रद्धाला मारहान देखील करायचा.
काही दिवस आधी आफताबने श्रद्धाची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर त्याने एक फ्रिज खरेदी केला आणि श्रद्धाच्या मृत शरीराचे 35 तुकडे करुन ते फ्रिजमध्ये ठेवले. त्यानंतर छतरपूरच्या जंगलामध्ये आफताबने वेग-वेगळ्या ठिकाणी ते फेकून दिले.
हेही वाचा :