घरमनोरंजनटी - 20मध्ये भारताच्या विजयानंतर शाहरुख खानने केले विराटचे कौतुक; अभिनेत्याचे ट्वीट चर्चेत

टी – 20मध्ये भारताच्या विजयानंतर शाहरुख खानने केले विराटचे कौतुक; अभिनेत्याचे ट्वीट चर्चेत

Subscribe

शाह रुख खान याने विराट साठी एक खास पोस्ट लिहिली आहे.

रविवार 23 ऑक्टोबर रोजी टी- 20 विश्वचषकातीळ लक्षवेधी असा भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना रंगला. पाकिस्तानविरुद्ध भारताने दमदार कामगिरी केली आणि भारताचा विजय झाला. त्यामुळे सर्वच देशवासीयांच्या दिवाळीचा आनंद सुद्धा द्विगुणित झाला. भारताच्या विजयचा उत्सव देशभर साजरा केला गेला. दरम्यान बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी विराट कोहलीला त्याच्या या दमदार कामगिरीबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. आता या यादीत बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच अभिनेता शाह रुख खान यांच्या नावाचा देखील समावेश झाला आहे. शाह रुख खान याने विराट साठी एक खास पोस्ट लिहिली आहे.

भारताने सामना जिंकताच सर्व देशवासियांप्रमाणेच बॉलिवूडमध्येही आनंदाची लाट उसळली. कार्तिक आर्यन, वरुण धवन, प्रीती झिंटा या कलाकारांनी सोशल मीडियावर भारताच्या विजयाचा आनंद व्यक्त केला. त्याचवेळी शाहरुखने टी-20 विश्वचषकात हा लक्षवेधी सामना जिंकल्याबद्दल भारतचे आणि विराटचे अभिनंदनही केले.

- Advertisement -

विराटच्या फलंदाजीवर शाहरुखचे ट्विट
भारताच्या विजयावर शाहरुख खानने ट्विटरवर केले आहे. किंग खानने लिहिले आहे की, ‘क्रिकेटचा जा खेळ आणि सामना पाहून खरंच खूप बरं वाटलं. भारताचा झालेला विजय पाहून आनंद होत आहे. विराटची फलंदाजी सुद्धा अप्रतिम होती.दरम्यान विराटला पुन्हा रडताना आणि हसताना पाहून माळ माझ्या चक दे ​​इंडिया या चित्रपटाची आठवण झाली. चक्र दे इंडिया या चित्रपटाची कथा सुद्धा खूपच प्रेरणादाई आहे. भारताचा विजय झाला आणि खऱ्या अर्थाने हैप्पी दिवाली आता सुरु झाली असं शाह रुख खान म्हणाला.

- Advertisement -

हे ही वाचा – आलिया – रणबीरची लग्नानंतरची पहिली दिवाळी; असं करणार सेलिब्रेशन

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -