मनोरंजन सृष्टीतील कलाकार त्यांच्या मालिका, चित्रपटांव्यतिरिक्त इतर कारणांमुळे देखील सतत चर्चेत असतात. हिंदी टेलिव्हिवरील असेच काही कलाकार आहेत जे एकेकाळी त्यांच्यावर झालेल्या आरोपामुळे चर्चेत आले होते.
भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया
कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया हे अलीकडे त्यांच्या बाळामुळे चर्चेत असतात. मात्र, एकेकाळी त्यांना 14 दिवसाच्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्या दोघांच्या जामीनावर सुटका करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरण समोर आले. त्यावेळी ड्रग्ज प्रकरणात तपास सुरु असताना एनसीबीच्या छाप्यामध्ये भारतीच्या घरी ड्रग्ज मिळाले होते. याचं प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली होती.
पर्ल वी पुरी
हिंदी टेलिव्हिजनवरील अभिनेता पर्ल वी पुरीवर देखील त्याच्या घरातील मोलकरणीने बलात्कार केल्याचा आरोप केला होता. यावेळी पोलिसांनी त्याला अटक केली होती.
मुनमुन दत्ता
तारक मेहता का उल्टा चश्मामधील बबीता म्हणजेच मुनमुन दत्ताला देखील अटक करण्यात आली होती. तिने एका विशेष समाजावर आणि जातिवर वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे तिला पोलिसांनी काही तासांसाठी ताब्यात घेतलं. त्यानंतर चौकशी करुन तिला सोडण्यात आलं.
श्रुति उल्फत
हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री श्रुति उल्फत 2017 साली तिच्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आली होती. या व्हि़डीओमध्ये तिने तिच्या हातामध्ये आणि नंतर गळ्या एक भयानक कोबरा गुंडाळला होता.त्यावेळी तिच्या आरोप दाखल करण्यात आला होता. त्यामुळे श्रुतिला 7 दिवसाचा तुरुंगावास भोगावा लागला.
करण मेहरा
‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेतील नैतिक ही भूमिका साकारणारा अभिनेता करण मेहरावर देखील त्याची पत्नी निशा रावलने मारहानीचा आरोप केला होता. यामुळे करणला काही दिवस तुरुंगात जावे लागले होते.
हेही वाचा :