घरफिचर्सभाजपा आता भाजपा राहिलेली नाही

भाजपा आता भाजपा राहिलेली नाही

Subscribe

कशीही सत्ता मिळवणे हे ध्येय नव्हतेच. तर एकहाती सत्ता व देशव्यापी पक्ष हे मुळचे उद्दीष्ट होते. अडवाणी आणि वाजपेयी त्यात अपयशी ठरले आणि तेव्हाच्या भाजपामध्ये जे यशवंत सिन्हा अरूण शौरी आलेले होते, त्यांच्याकडून असे काही साध्य होण्याची अजिबात शक्यता नव्हती. त्यामुळे ते शिवधनुष्य पुढल्या पिढीच्या नेतृत्वाला उचलावे लागले. सलग दहा वर्षे गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून कारभार करताना त्यातील पंतप्रधान धडे गिरवत होता आणि पक्षाची संघटना जनतेपर्यंत नेऊन बस्तान रुंदावण्याचे प्रायोगिक धडे तिथलाच अमित शहा नावाचा तरूण गिरवत होता.

नरेंद्र मोदी भले भाजपाचे सर्वोच्च नेता झालेले असतील. पण त्यांच्या पक्षाला एकहाती बहुमत मिळू शकत नाही आणि आघाडीच्या सरकारमध्ये जो समतोल सांभाळावा लागतो, तितके मोदी लवचिक नाहीत. म्हणूनच एनडीएला एकवेळ सत्ता मिळेल. पण मोदी अशा सरकारचे मुखिया असू शकत नाहीत, हा २०१४ चा मुख्य सिद्धांत होता. गुजरातमध्ये मोदींनी एकहाती बहुमतावर अन्य लोकांचे आवाज दडपून कारभार केला. इतर कोणाच्या मताला किंमतच दिली नाही. सहाजिकच मोदींना दिल्लीत इतर पक्षांना सोबत घेऊन सांभाळून कारभार करताच येणार नाही. हा तेव्हा मोदी विरोधकांचा एक शेवटचा आधार होता. कारण त्यापैकी अनेकांचा भाजपावर आक्षेप नव्हता वा तशी काही राजकीय भूमिका नव्हती. आजही अनेकांचा विरोध भाजपाला नसून मोदी या व्यक्तीशी वैर आहे. मोदी नको इतकाच त्यांच्या राजकीय भूमिकेचा पाया आहे.

पण त्यांचे दुर्दैव असे, की त्यांनी कधी मोदी या माणसालाच समजून घेतले नाही. तर त्याच्या यशाचे रहस्य उलगडून त्याच्याशी सामना करण्याचा विषयच कुठे येतो? म्हणून मग गुजरात म्हणजे भारत नव्हे, इथपासून विविध बाबतीत मोदी कसे अयोग्य आहेत, त्याचा पाढा वाचला जात होता. त्यातील शेवटचा युक्तीवाद एका पक्षाला बहुमत मिळवण्याचे दिवस संपलेत, हाच होता. तेही स्वाभाविक होते. त्यापुर्वी काँग्रेस वगळता अन्य कुठल्या पक्षाला एकपक्षीय बहुमत मिळवता आलेले नव्हते आणि जनता पक्षाला १९७७ सालात मिळालेले यश, चार पक्षांच्या आघाडीला एक पक्ष म्हणून नोंदवल्याने मिळालेले होते. तरीही त्यातले चारही राजकीय गट तसेच्या तसे कार्यरत होते आणि प्रसंग येताच ते वेगळेही झाले. पण अन्यथा कुठल्या बिगर काँग्रेसी पक्षाला एकहाती बहुमत कधी मिळवता आलेले नव्हते. सहाजिकच २०१४ मध्ये तशी शक्यता कोणी कधीच बाळगली नाही. अगदी भाजपाच्या कडव्या समर्थकांनाही तसे वाटलेले नव्हते.

- Advertisement -

१९८४ सालात म्हणजे आठव्या लोकसभेत राजीव गांधींना इंदिराहत्येचा लाभ मिळाला. तेव्हा एकपक्षीय बहुमताचा शेवटचा निकाल लागला होता. पुढे 19८९ सालात विरोधकांची एकजूट झाली आणि काँग्रेस व राजीव गांधी यांनी सत्ता गमावली. त्यानंतर सात लोकसभा निवडणुका अशा झाल्या, की कुठल्याही एका पक्षाला बहुमतापर्यंत पल्ला गाठता आला नाही. आघाड्या बनत राहिल्या, मोडत राहिल्या आणि सरकारे बनत कोसळत राहिली. आघाडीतील पक्ष एकमेकांना शह काटशह देताना कारभाराचा चुथडा करीत राहिले. पण दरम्यान काँग्रेस नेतृत्वहीन झाली होती आणि आपल्या पायावर पुन्हा उभे राहाण्याची उमेद गमावून बसलेली होती. ती पोकळी भरून काढण्यासाठी भाजपने योजलेल्या प्रयोगाला पोषक परिस्थिती तिथून निर्माण झालेली होती. डबघाईला आलेली काँग्रेस आणि आघाड्यांची सत्तालालसा, याला कंटाळलेल्या मतदाराला पर्याय हवा होता आणि भाजपा वगळता तो विचार कोणाच्याच मनाला शिवलेला नव्हता.

पण तशी संधी मिळाल्यावर भाजपच्या तत्कालीन ज्येष्ठ नेत्यांना ते शिवधनुष्य पेलवता आले नाही. अटलबिहारी पंतप्रधान झाले आणि त्यांनी आघाडीचे सरकार बनवलेही. पण पक्षाचे उद्दीष्ट तितकेच नव्हते. कशीही सत्ता मिळवणे हे ध्येय नव्हतेच. तर एकहाती सत्ता व देशव्यापी पक्ष हे मुळचे उद्दीष्ट होते. अडवाणी आणि वाजपेयी त्यात अपयशी ठरले आणि तेव्हाच्या भाजपामध्ये जे यशवंत सिन्हा अरूण शौरी आलेले होते, त्यांच्याकडून असे काही साध्य होण्याची अजिबात शक्यता नव्हती. त्यामुळे ते शिवधनुष्य पुढल्या पिढीच्या नेतृत्वाला उचलावे लागले. सलग दहा वर्षे गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून कारभार करताना त्यातील पंतप्रधान धडे गिरवत होता आणि पक्षाची संघटना जनतेपर्यंत नेऊन बस्तान रुंदावण्याचे प्रायोगिक धडे तिथलाच अमित शहा नावाचा तरूण गिरवत होता. ते जेव्हा राष्ट्रीय पटलावर आले तेव्हा त्यांना म्हणूनच कोणी जोखूही शकले नव्हते.

- Advertisement -

म्हणून तर २०१४ मध्ये नरेंद्र मोदी राष्ट्रीय क्षितीजावर उगवले, तेव्हा राजकीय अभ्यासकांपासून विरोधकांपर्यंत कोणालाही त्यातली क्षमता वा व्याप्ती कळू शकली नाही. इतरांचे सोडूनच द्या, खुद्द अडवाणी, सुषमा स्वराज अशा भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनाही त्याचा आवाका आलेला नव्हता. मग उथळ थिल्लर वाहिन्यांवरील चर्चेतच ज्यांची बुद्धी कुंठीत झालेली आहे, त्यांना कुठला सुगावा लागायचा? ते मुल्लाची टोपी, कुत्तेका पिल्ला, गुजरात दंगल, इशरत जहाँ असली जपमाळ ओढत बसले होते. मग चार महिन्यांनी मोदी गुजरातबाहेर वाराणशीला उभे राहाणार अशी बातमी आली, तेव्हा या लोकांना पहिला धक्का बसला होता. तिथून मग बाकीचे आरोप मागे पडले आणि आघाडीशिवाय सरकार बनू शकत नसल्याचा सिद्धांत आग्रहाने पुढे आणला गेला. उत्तरप्रदेश बिहारची जबाबदारी प्रयोग म्हणूनच अमित शहांकडे सोपावली गेली होती. कारण एकपक्षीय बहुमत मिळवण्यासाठी या दोन मोठ्या राज्यांतून अधिकाधिक जागा जिंकण्याला प्राधान्य होते. भाजपने लढवण्यासारख्या ३५० जागाच होत्या.

त्यातून बहुमतापर्यंत पल्ला गाठण्याचे उद्दीष्ट होते. ते साक्षात समोर येऊन निकालाच्या दिवशी उभे राहिले, तेव्हा उथळ पाण्याचा खळखळाट थांबला. पण कुठे गणिते समिकरणे चुकली, त्याचा विचारही होऊ शकला नाही. आपल्या मुर्खपणाला मग लॉटरी ठरवले गेले आणि विधानसभेतही भाजपाला एकहाती विजयाचा मार्ग मोकळा करून देण्यात आला. गतवर्षी उत्तरप्रदेश विधानसभा जिंकल्यानंतर थोडी अक्कल येऊ लागली. इशान्येला त्रिपुरातून डाव्यांना उखडून टाकल्यावर खरीखुरी जाग आलेली आहे. पण नावडते वास्तव पटत असले तरी स्विकारणे बुद्धीमंत माणसाला अधिक अवघड असते. आजचा भाजप हा १९८० चा भाजप राहिलेला नाही, तर तो त्या काळातली काँग्रेस आहे. येईल त्याला सोबत घेऊन व सत्तेची हाव असलेल्यांना समावून घेणारा एकमेव राष्ट्रीय देशव्यापी पक्ष झाला आहे.’

भाऊ तोरसेकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -