जीवनभर निरोगी राहण्यासाठी आपले शरीर सुदृढ राहणे गरजेचे आहे. त्यासाठी योग्य तो आहार घेणे तितकेच आवश्यक आहे. व्हिटॅमिनच्या अभावामुळे अनेक आजारांचा विळख्यात अडकू शकतो. ज्याप्रमाणे आरोग्य सुधारण्यासाठी व्हिटॅमिन A,B,C आणि D आवश्यक आहे त्याचप्रमाणे व्हिटॅमिन बी-१२ हे आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे. जर या व्हिटॅमिन प्रमाण आपल्या शरीरात योग्य असेल तर, तुम्ही कधीही आजारी पडू शकत नाही.
व्हिटॅमिन बी-१२ च्या कमतरतेमुळे विस्मरण, हाड दुखण्याची समस्या याशिवाय संपूर्ण मज्जासंस्थेवरही वाईट परिणाम होऊन शरीराच्या प्रत्येक अवयवापर्यंत रक्त पोहोचवण्यातही त्रास होतो. त्यामुळे व्हिटॅमिन बी-१२ आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे. जर तुम्ही व्हिटॅमिन बी-१२ असणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश नाही केलात तर अनेक आजाराच्या समस्या उद्भवू शकतात. काही वाईट जीवाणू, प्रतिजैविक, शस्त्रक्रिया आणि टेपवार्म्स देखील व्हिटॅमिन बी-१२ ची कमतरता निर्माण करू शकतात.
व्हिटॅमिन बी-१२ च्या अभावामुळे होणारे परिणाम
- वारंवार मूड बदलणे
- तणाव निर्माण होतो
- खूप थकवा येणे
- चक्कर येणे
- भूक नसणे
- वजन कमी होणे
- हाता-पायांना मुंग्या येणे
- जलद हृदयाचा ठोका
- स्नायूंची कमजोरी
व्हिटॅमिन बी-१२च्या अभावामुळे नर्वस सिस्टम डॅमेज होते.महिलांच्या प्रसूतीच्या वेळी या व्हिटॅमिन-बी-१२ची आवश्यकता भासते.त्यामुळे आहारात योग्य त्या पदार्थांचा समावेश केल्यावर व्हिटॅमिन-बी-१२ चे प्रमाण वाढवू शकता.
व्हिटॅमिन बी-१२ साठी ‘या’ पदार्थाचे करा सेवन
- अंडी
- सोयाबीन
- दही
- पनीर
- ओट्स
- दूध ब्रोकली
- मशरूम
- मासे
हे ही वाचा – लसीकरणाचं किमान वय १५ वर्ष करा; आदित्य ठाकरेंचं केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पत्र