घरमहाराष्ट्रAmit Thackeray : "मलाही या ग्रेट-भेटीचा साक्षीदार होता आलं!" अमित शहांच्या भेटीनंतर...

Amit Thackeray : “मलाही या ग्रेट-भेटीचा साक्षीदार होता आलं!” अमित शहांच्या भेटीनंतर अमित ठाकरेंची पोस्ट

Subscribe

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे काल रात्रीच दिल्लीत दाखल झाले होते. ज्यानंतर मनसेला एनडीएचा घटकपक्ष करण्याच्या हालचाली वाढल्या. आज दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज ठाकरे यांच्यामध्ये साधारणतः अर्धा तास चर्चा झाली. राज ठाकरे दिल्लीतील ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, तिथे त्यांना घेण्यासाठी भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे पोहोचले होते. या भेटीनंतर राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्याकडून पोस्ट करण्यात आली आहे. तर स्वतः राज ठाकरे यांनी या भेटीच्या काही मिनिटांमध्ये अमित शहांसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. (Amit Thackeray’s post after meeting Amit Shah)

हेही वाचा… Raj Thackeray Meet Amit Shah : राज ठाकरे अमित शहांमध्ये अर्धा तास चर्चा; युतीची घोषणा मुंबईत?

- Advertisement -

मनसे नेते अमित ठाकरे यांनी फेसबुकवर पोस्ट करत लिहिले की, “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय श्री. राजसाहेब ठाकरे यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री श्री. अमित शाह साहेब यांची भेट घेतली. मलाही या ग्रेट-भेटीचा साक्षीदार होता आलं!” तर राज ठाकरे यांनी X या सोशल मीडिया साइटवर पोस्ट करत दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट झाल्याचे म्हटले आहे.

आज मंगळवारी दिल्लीत झालेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीमध्ये गा वाटपाबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा करण्यात आली. या भेटीचे काही फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तर, या भेटीत नेमकी काय चर्चा करण्यात आली. याबाबतचा कोणताही तपशील समोर आलेला नाही. ज्यामुळे मुंबईत येऊनच राज ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु, या भेटीमुळे राज्यात मोठ्या राजकीय उलथापालथीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या 18 वर्षांपासून स्वतंत्रपणे निवडणूक लढवली आहे. मात्र, तरी देखील त्यांची सत्ता येऊ शकली नाही. ज्यामुळे आता कमीत कमी युतीत सहभागी होऊन सत्तेत जाता येते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राज ठाकरे यांची ताकद मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि औरंगाबादमध्ये सर्वाधिक आहे. त्यामुळे राज ठाकरे महायुतीत आल्यास त्यांना मुंबईतील जागा सोडल्या जाऊ शकतात अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. परंतु, त्यातही दक्षिण मुंबईची जागा ही बाळा नांदगावकर यांना देणार असल्याचे आता जवळपास निश्चित झाले आहे. ज्यामुळे मुंबई दक्षिण मुंबई लोकसभेत ठाकरे वि. ठाकरे अशी लढत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -