औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम आहे. आज सकाळी औरंगाबाद जिल्ह्यात ३९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ९ हजार १०४ वर पोहचला आहे. आत्तापर्यंत ३६४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ९ हजार १०४ वर पोहोचला आहे. आत्तापर्यंत ५ हजार ३५५ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ३ हजार २९५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर कमी होताना दिसत नाही आहे. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर औंरगाबादमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. औरंगाबाद शहर आणि वाळुंज परिसरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. १० जुलै ते १८ जुलै दरम्यान कडक निर्बंध लागू असणार आहेत.
- Advertisement -
हे ही वाचा – Corona: जगात कोरोनाचा विळखा होतोय घट्ट, २४ तासांत २.१५ लाख नवीन रुग्ण