घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरसरकार अजित पवारांना घाबरते, धनंजय मुंडेंचा टोला

सरकार अजित पवारांना घाबरते, धनंजय मुंडेंचा टोला

Subscribe

बीड – विरोधी पक्षांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली जात आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी पालकमंत्री न नेमल्यावरून शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली. यावेळी त्यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे कौतुक केले. ते बीड येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलत होते.

अजित पवारांच्या कामाचे कैतुक करताना धनंजय मुंडे यांनी अजित पवारांचे पहिल्यापासून मराठवाड्यावर खूप प्रेम आहे. अजित पवारांनी जलसंपदा मंत्री आणि उपमुख्यमंत्री असताना मराठवाड्याच्या हिताचे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. बीड जिल्ह्यात शेतीचे उत्पन्न वाढवणारा निर्णयही अजित पवारांनी घेतला. कोविडच्या काळात कुणी-कुणाला घरात घेत नव्हते. मुंबईमध्ये आपला सख्खा भाऊ काम करत असला, तर त्याला परत गावात घेतले जात नव्हते. करोनाच्या कठीण काळात सामान्य माणूस माणुसकी विसरला होता. पण राजकारणी म्हणून अजित पवारांनी माणुसकी कशी जिवंत ठेवली, हे आपण सर्वांनी पाहिले आहे, असे आमदार धनंजय मुंडे म्हणाले. पुढे त्यांनी अजित पवार सकाळी 7 वाजल्यापासून मंत्रालयात उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राकडे लक्ष देत होते. त्यामुळे त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या माझ्यासारख्या युवा कार्यकर्त्याला अभिमान वाटतो. करोना काळात माणुसकी जिवंत ठेवायचे काम अजित पवारांनी केले, असेही आमदार अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

आजचा प्रसंग वेगळा आहे. आम्ही विरोधी पक्षाची भूमिका पार पाडत आहोत. हे सरकार सत्तेवर कसं आलंय? हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. हे सरकार सत्तेत आल्यापासून बेशिस्तपणे वागत आहेत. ते केवळ विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवारांना घाबरतात. समोरचे कितीही मातबर राजकारणी असू द्या, सरकार बेशिस्तीत वागायला लागते, तेव्हा विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवारच सरकारला शिस्तीत आणू शकतात, अशी फटकेबाजी धनंयज मुंडे यांनी केली. यावेळी त्यांनी पालकमंत्री न नेमण्यावरून टीका केली आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -