घरमहाराष्ट्रमुंबईसह राज्यातील रिक्षाचालक-मालक ९ जुलैला संपावर

मुंबईसह राज्यातील रिक्षाचालक-मालक ९ जुलैला संपावर

Subscribe

मुंबई, ठाणे, रायगड, पालघरसह राज्यातील रिक्षाचालक-मालक ९ जुलै रोजी संपावर जाणार आहेत.

मुंबई, ठाणे, रायगड, पालघरसह राज्यातील रिक्षाचालक-मालक ९ जुलै रोजी संपावर जाणार आहेत. रिक्षा भाडेवाढ, अवैध प्रवासी वाहतुकीसह ओला, उबरसारख्या टॅक्सी कंपन्यांची सेवा त्वरित बंद करण्याच्या मागण्यांसाठी रिक्षाचालक-मालक संघटनांनी हा संप पुकारला आहे. त्यामुळे मंगळवारी रिक्षाने प्रवास करणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. राज्य परिवहन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत वेळोवेळी बैठका घेऊन त्यांच्यासमोर मागण्या मांडल्या. मात्र, मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात सरकारकडून कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही, असं रिक्षाचालक संघटनांचं म्हणणं आहे. संपात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुण्यासह राज्यातील इतर प्रमुख शहरांमधील लाखो रिक्षाचालक सहभागी होणार आहेत. ३० जूनपर्यंत राज्यभरातील ऑटोरिक्षा चालकांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर ९ जुलै २०१९ पासून मुंबईसह महाराष्ट्रातील ऑटोरिक्षा चालक-मालक संपावर जाण्याच्या इशारा यापूर्वीच संघटनेने राज्य सरकारला दिला होता.

या आहेत प्रमुख मागण्या

  • ओला, उबरसारख्या अवैध टॅक्सी कंपन्यांची सेवा त्वरित बंद करावी
  • चालक-मालकांना पेन्शन, उपदान (ग्रॅज्युईटी), भविष्य निर्वाह निधी व वैद्यकीय मदत दिली जावी
  • चार ते सहा रुपये भाडेवाढ करावी
  • रिक्षा चालक-मालकांसाठी असलेले कल्याणकारी महामंडळ परिवहन खात्यांतर्गत असावे
  • विमा कंपनीत भरण्यात येणारे पैसे तिथे न भरता कल्याणकारी महामंडळात जमा करावे
  • जुन्या हकिम समितीच्या शिफारशीनुसार तातडीने रिक्षा भाडेवाढ करावी
  • बेकायदा प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी विशेष भरारी पथकाची नियुक्ती करावी
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -