घरमहाराष्ट्रकाँग्रेसच्या १३ राज्यातील प्रदेशाध्यक्षांचे राजीनामे

काँग्रेसच्या १३ राज्यातील प्रदेशाध्यक्षांचे राजीनामे

Subscribe

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरू आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम असताना आता विविध राज्यांचे प्रभारीदेखील राजीनामे देऊ लागले आहेत. आसामपासून पंजाबपर्यंत आणि मध्य प्रदेशपासून राजस्थानपर्यंत दिग्गज नेत्यांनी राजीनामे दिले आहेत. आतापर्यंत पक्षाच्या 13 राज्यांतील प्रदेशाध्यक्षांनी त्यांचे राजीनामे राहुल गांधींकडे पाठवले आहेत.

गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीकडे पक्षाची धुरा देण्यावर राहुल गांधी ठाम आहेत. मात्र काँग्रेसने त्यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही. आपली जागा घेऊ शकेल अशी व्यक्ती शोधा, अशा सूचना राहुल यांनी पक्षाच्या दोन वरिष्ठ नेत्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. काँग्रेसमधील 13 बड्या नेत्यांनी राहुल यांच्या पावलावर पाऊल ठेवत राजीनामे दिले आहेत. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी निवडणूक निकाल आल्यानंतर दुसर्‍याच दिवशी राजीनामा दिला. अशोक चव्हाण यांच्यानंतर पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष सुनील जाखड, झारखंड काँग्रेसचे अध्यक्ष अजोय कुमार आणि आसामचे अध्यक्ष रिपुन बोरांनी सोमवारी त्यांचे राजीनामे राहुल गांधी यांना पाठवल

- Advertisement -

जाखड यांनी गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत विजय मिळवला होता. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते भाजपचे सनी देओल यांच्याकडून पराभूत झाले. उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष राज बब्बर आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनीदेखील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. याशिवाय काँग्रेसच्या अनेक पदाधिकार्‍यांनीदेखील राजीनामे दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -