घरमहाराष्ट्र"हे गृह खात्याचे अपयश आहे का?" या प्रश्नावर अजित पवारांची खोचक प्रतिक्रिया

“हे गृह खात्याचे अपयश आहे का?” या प्रश्नावर अजित पवारांची खोचक प्रतिक्रिया

Subscribe

आदरणीय पवार साहेबांना सोशल मिडियावर ‘तुमचा लवकरंच दाभोलकर होणार...’ अशी देण्यात आलेली धमकी, हे गंभीर प्रकरण आहे. केंद्र आणि राज्य सरकारनं या धमकीची गांभीर्यानं दखल घेऊन आरोपींना तातडीनं गजाआड करावं, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे.

आदरणीय पवार साहेबांना सोशल मिडियावर ‘तुमचा लवकरंच दाभोलकर होणार…’ अशी देण्यात आलेली धमकी, हे गंभीर प्रकरण आहे. केंद्र आणि राज्य सरकारनं या धमकीची गांभीर्यानं दखल घेऊन आरोपींना तातडीनं गजाआड करावं. धमकीमागचा खरा मास्टरमाईंड शोधावा. अशा विचारांच्या समाजविघातक शक्तींना वेळीच रोखावं, हेच राज्याच्या हिताचं असेल,” अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे.

हेही वाचा – संजय राऊत, सुनील राऊतांना जीवे मारण्याचा धमकीचा कॉल

- Advertisement -

राज्यात जी काही प्रकरणे घडत आहेत त्यासाठी गृहमंत्री कमी पडत आहेत का? असा प्रश्न यावेळी पत्रकारांकडून अजित पवार यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देत अजित पवार संताप व्यक्त करत म्हणाले की, या संदर्भात मला कोणतीही राजकारण करायचे नाही. तुम्ही हे असे काही प्रश्न विचारून हेडलाईन करण्याचा प्रयत्न करू नका. कोण कमी पडतं आणि कोण योग्य हे ठरवण्याचा हक्क मीडियाचा आहे. हे जे काही प्रकार सुरु आहेत, त्याचा तीव्र शब्दात निषेध करतो, असे अजित पवार यांच्याकडून सांगण्यात आले.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांना सोशल मीडियावर देण्यात आलेल्या धमकीवर प्रतिक्रिया देताना अजित पवार पुढे म्हणाले की, आदरणीय पवार साहेबांचं संरक्षण करण्यास महाराष्ट्रतील जनता समर्थ आहे. परंतु डॉ. दाभोलकरांची हत्या करणाऱ्या शक्ती राज्यात पुन्हा सक्रीय झाल्या आहेत, ही बाब अधिक चिंताजनक आहे. निवडणुका जवळ येऊ लागल्यानं यापुढे जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषावादाचे असे मुद्दे उपस्थित करुन समाजात द्वेष निर्माण करण्याचे, दुही माजवण्याचे, मतांच्या ध्रुवीकरणाचे प्रयत्न होतील. ते हाणून पाडले जातील. देशातील जनता आता सावध आहे. समाजात द्वेष निर्माण करणाऱ्यांच्या भूलथापांना भुलणार नाही. कुणाच्याही कटकारस्थानांना बळी पडणार नाही.

- Advertisement -

तसेच, शेतकऱ्यांचे प्रश्न, कष्टकऱ्यांच्या समस्या, महिलांवरील अत्याचार, वाढती महागाई, वाढती बेरोजगारी याच मुद्यांवर यापुढे महाराष्ट्र ठाम राहील. विकासाच्या मुद्यांवरुन महाराष्ट्राची जनता आता तसूभरही बाजूला हटणार नाही, असा विश्वासही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. आदरणीय पवार साहेबांना सोशल मिडियावरुन देण्यात आलेली जाहीर धमकी गंभीर मुद्दा असून, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याची गांभीर्यानं दखल घ्यावी, या मागणीचा पुनरुच्चारही अजित पवार यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -