घरमहाराष्ट्रराज ठाकरे आमच्या मनातलंच बोलले - आव्हाड

राज ठाकरे आमच्या मनातलंच बोलले – आव्हाड

Subscribe

'राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात अनेकांना शदर पवारांचा आधार घ्यावा लागतो हे आज मुख्यमंत्र्यांनी पुन्हा सिद्ध केले', असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले…

पत्रकारांशी बोलताना आव्हाड म्हणाले की, ‘राज ठाकरे यांना बारामतीचा पोपट म्हणणारे मुख्यमंत्री बहुधा हे विसरले आहेत की, राज ठाकरेंनीच २०१४ च्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींची पाठराखण केली होती. त्यावेळी त्यांना पोपट म्हणणारे कुठे होते? मी शरद पवारांची करंगळी धरून राजकारणात आल्याचं स्वत: पंतप्रधान मोदी म्हणाले होते.’ दरम्यान, ‘राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात अनेकांना शदर पवारांचा आधार घ्यावा लागतो आणि त्यासाठी त्यांचे नावही वापरले जाते हे आज मुख्यमंत्र्यांनी पुन्हा सिद्ध केले’, असा टोला आव्हाड यांनी लगावला.

काय म्हणाले होते मुख्यमंत्री?

मुंबईत झालेल्या भाजप मेळाव्यात राज ठाकरेंना टार्गेट करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते की, ‘हे जे बोलतात त्याची स्क्रीप्ट बारामतीवरुन येते. याचं भाषण तिथून लिहून दिलं जातं. राज हे बरामतीचे बोलके पोपट आहेत. बारामतीला पोपटांची कमी पडली, की ते नवा पोपट शोधतात’. ‘नरेंद्र मोदी हे सूर्यासारखे असून सूर्याकडे पाहून थुंकलं की थुंकी आपल्याच तोंडावर पडते’, असंही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी खोचकपणे म्हणाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -