वाचा: नाशिकचे पाणी जायकवाडीला दिल्यास, पालकमंत्र्यांना शहरात प्रवेश नाही
समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार, अहमदनगर-नाशिक जिल्ह्यातील धरणातून – जायकवाडी धरणात ८.९९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे कार्यालयीन आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी काढले आहेत. जायकवाडी धरणातील पाण्याची तूट लक्षात घेऊन ७ टीएमसी पाणी सोडण्याचे निश्चित करण्यात आले. मात्र, नगर-नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांचा विरोध पाहता, पाणी सोडल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे.