घरताज्या घडामोडीमहाविकास आघाडीसोबत जाऊन उद्धव ठाकरेंनीच गद्दारी केली, नारायण राणेंचा थेट निशाणा

महाविकास आघाडीसोबत जाऊन उद्धव ठाकरेंनीच गद्दारी केली, नारायण राणेंचा थेट निशाणा

Subscribe

भारताला उत्पादन केंद्र बनवायचे आहे..,एससीओ शिखर परिषदेत पंतप्रधानांचं मोठं वक्तव्य

2019 च्या निवडणुकीत शिवसेना-भाजप एकत्र निवडणूक लढली असताना उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीची स्थापना करुनच खरी गद्दारी केल्याचा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. तसेच महाविकास आघाडीसोबत जाऊन उद्धव ठाकरेंनीच गद्दारी केली, असा थेट निशाणा नारायण राणेंनी ठाकरेंवर लगावला आहे.

महाविकास आघाडीसोबत जाऊन उद्धव ठाकरे यांनीच गद्दारी केली. त्यावेळी त्यांनी सर्व शिवसैनिकांना विचारात घेऊन निर्णय घेतला नाही. तर स्वार्थासमोर त्यांना सर्वच बाबींचा विसर पडल्याचे राणे म्हणाले आहेत. त्यामुळे खरे गद्दार कोण हे आता जनतेचे समोर उघडकीस आले आहे. शिवसेना पक्ष हा बाळासाहेब ठाकरे यांचे नेतृत्व आणि त्यांना शिवसैनिकांची मिळालेली साथ यामुळे घडला आहे. काळाच्या ओघात याचा विसर अनेकजणांना पडला असला तरी प्रत्येक शिवसैनिकांना इतिहास हा माहिती आहे.

- Advertisement -

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी राजीनामा दिला तरी काय फरक पडणार आहे, असा सवाल राणेंनी उपस्थित केला. सत्तेत असून काही फरक पडला नाही. आता विरोधात असल्याने त्यांनी रस्त्यावर उतरणे गरजेचे असल्याचे मत राणेंनी मांडले. शिवसैनिक हा बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत उभा राहिल्यानेच ही संघटना वाढत गेली. आदित्य ठाकरे आता त्यावरील लोणी खाण्याचे काम करीत आहेत, असं राणे म्हणाले.


हेही वाचा : भारताला उत्पादन केंद्र बनवायचे आहे..,एससीओ शिखर परिषदेत पंतप्रधानांचं मोठं वक्तव्य

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -