घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रआदिवासी युवकांनी बंद केले दारूअड्डे

आदिवासी युवकांनी बंद केले दारूअड्डे

Subscribe

इगतपुरी : अवैध विषारी गावठी दारूमुळे आदिवासी समाजाची वाताहत होत असुन हा समाज संपुष्टात येत आहे. या पाश्र्वभुमीवर इगतपुरी तालुक्यातील काळुस्ते, भरवज, निरपण या तीन गावांतील तरुण युवकांनी एकत्र येत पुढाकार घेऊन गावात दारू बंद करण्यासाठी जोमाने काम सुरु केले आहे. या सर्व युवकांनी संबंधित दारू विक्री करणार्‍या धंदेवाल्यांकडे जाऊन त्यांचे समुपदेशन करत त्यांनी दारूबंदी करण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंती केली.

रविवारी दिवसभरात या युवकांनी किमान २०० लिटर गावठी दारूच्या डबक्या जमा करून नष्ट केल्या. त्यामुळे सोमवारपासून या परिसरात गावठी दारू विकली जाणार नाही असा विश्वास या युवकांकडून व्यक्त करण्यात आला आहे. परिसरातील महिलांनी युवकांच्या उपक्रमाचे स्वागत केले असून इगतपुरी पोलिसांनीही ह्या कामात आवश्यक ते सर्व सहाय्य देण्याची भूमिका घेतली आहे.

- Advertisement -

गावठी दारूमुळे आदिवासी समाजात लाचारी आणि गुलामगिरी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. तर या गावठी दारूमुळे अनेक युवक दगावले आहेत. गावातील अनेक तरुणांचे संसार आजपर्यंत उद्ध्वस्त झाले आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढून लोकशाही व्यवस्था संपुष्टात आली आहे. त्यामूळे गावातील युवकांनी दारू आणि ताडीबंदी झालीच पाहिजे असा एल्गार पुकारला. परिसरातील सर्व गावठी दारू व ताडीच्या अड्डयावर जाऊन संबंधितांना सूचना दिली. त्यानंतर दोनशे लिटर दारूचा साठा जमा करुन घेतला. या उपक्रमात संदीप गवारी, राजेंद्र घारे, शरद घारे, सदाशिव घारे, दत्ता घारे, दीपक गवारी, योगेश इदे, गणेश घारे, साईनाथ सुर्यवंशी, गौरव घारे, निशांत मोरे आदी युवक सहभागी होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -