घरमहाराष्ट्रनाशिकपतंगोत्सव साजरा करताना दक्षता बाळगा : महावितरणचे आवाहन

पतंगोत्सव साजरा करताना दक्षता बाळगा : महावितरणचे आवाहन

Subscribe

नाशिक : संक्रातीनिमित्त पतंगोत्सव साजरा करताना नागरिकांनी वीजवाहिन्या आणि ट्रान्स्फॉर्मर यांच्यापासून सावधगिरी बाळगावी,, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. महावितरणच्या उच्च आणि लघुदाबाच्या वीजवाहिन्या प्रामुख्याने शहरीभागासह ग्रामीण भागातही अस्तित्वात आहेत. वीजवाहिन्या असलेल्या परिसरात संक्रातीनिमित्त नागरिक आणि लहान मुले मोठ्या संख्येने पतंग उडवितात. वीजवाहिन्यांमध्ये पतंग अडकल्यास ते काढण्यासाठी धोका पत्करल्यास शॉक बसूनअपघात होण्याची शक्यता असते.

अनेकदा पतंग उडविताना किंवा कटलेले पतंग विजेच्या तारांवर किंवा खांबावर अडकतात. अशावेळी ते अडकलेले पतंग काठ्या, लोखंडी सलाखी, किंवा गिरगोट यांच्या माध्यमातून काढण्याचा प्रयत्न करतात. अश्यावेळी अनेकदा जिवंत विद्युत तारेला स्पर्श होवून जीवावर बेतू शकते त्यामुळे असे प्रयत्न करू नये. अनेकदा अडकलेल्या पतंगाचा मांजा खाली जमिनीवर लोंबकळत असतो हा मांजा ओढून पतंग काढण्याच्या प्रयत्नात विजेचा भीषण अपघात होऊ शकतो. मांजा ओढतांना एका तारेवर दुसर्‍या तारेचे घर्षण होवून शॉर्टसर्किटमुळे प्राणांकीत अपघात होवून त्यामुळे वीजपुरवठा खंडित होवू शकतो. प्रामुख्याने शहरासह ग्रामीण भागातही वीज यंत्रणा सर्वत्र अस्तिवात आहेत. वीज वाहिन्यांच्या परीसरात नागरिक आणि लहान मुले पतंग उडवितात. अनेक पतंग या विजवाहिन्यामध्ये किंवा इतर यंत्रणेत अडकतात व यावेळी पतंग काढताना अनेकवेळा अपघात घडतात. मांजा वापरण्यावर कायदेशीर बंदी असून या मांजावर धातुमिश्रित रसायनाचे कोटिंग केलेले असल्यामुळे त्यातून वीज प्रवाह संचार करू शकतो. असा मांजा विद्युत तारेला अडकताच विद्युत यंत्रणेमध्ये बिघाड होऊन संबंधित भागातील वीज पुरवठा खंडित होऊ शकतो व त्याचबरोबर अपघाताची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही, त्यामुळे कुठलाच मांजा वापरुचं नये.

- Advertisement -

नागरिक आणि लहान मुलांनी वीज वाहिन्या,वीज यंत्रणा असलेल्या परिसराएवजी सुरक्षित आणि मोकळ्या मैदानात पतंगोत्सव साजरा करावा. पालकांनी याबाबत दक्ष राहून लहान मुलांना सुरक्षितपणे पतंग उडविण्याबाबत मार्गदर्शन करावे व सोबत राहावे. वीजप्रवाह असलेल्या यंत्रणेपासून दूर राहूनच पतंगोत्सव साजरा करावा. वीजतारा व वाहिन्यांमध्ये अडकलेले पतंग व धागे वादळ वारा व पावसामध्ये वीज पुरवठा खंडित होण्यास कारणीभूत ठरत असतात.त्यामुळे ग्राहकांना विजेपासून वंचित राहावे लागते. अपघाताच्या दुर्दैवी घटना टाळण्यासाठी सतर्कता व सावधानता बाळगावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. तातडीच्या मदतीसाठी व संबंधित क्षेत्रातील महावितरणच्या कार्यालयाशी किंवा तसेच महावितरणच्या 24 तास सुरु असणार्‍या कॉल सेंटरचे १९१२, १८००-२१२-३४३५, १८००-२३३-३४३५ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -