घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रअपघातस्थळाची रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या पथकाकडून पाहणी

अपघातस्थळाची रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या पथकाकडून पाहणी

Subscribe

पंचवटी : औरंगाबाद रोडवरील मिर्ची सिग्नलवर शनिवारी (दि.८) पहाटे झालेल्या भीषण अपघातात १२ प्रवाशांचा बळी गेले होते. अपघात नेमका कशामुळे घडला, याबाबत वरिष्ठ पातळीवर चौकशी सुरू झाली आहे. त्याकरिता रस्ते वाहतूक मंत्रालय समितीकडून अपघात घडलेल्या ठिकाणाची पाहणी करण्यात आली. याबाबत संपूर्ण माहिती घेऊन अहवाल सादर केला जाणार आहे.

सदर अपघात कसा घडला, कोणत्या कारणांमुळे घडला, यामध्ये नेमकी चूक कोणाची होती असे अपघात भविष्यात घडू नये, यासाठी कोण कोणत्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. सद्या परिस्थिती व पुढील सुधारणेसाठी समितीकडून आवश्यक माहिती गोळा करणार असून, घडलेल्या अपघाताची माहिती संकलित करण्यासाठी रस्ते व वाहतूक मंत्रालय समितीची पथक नाशिकमध्ये दाखल झाली होती. या पथकाने त्यानुसार नाशिक शहर पोलीस विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, नाशिक महापालिका यांचे संबंधित विभागाचे अधिकारी व आडगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी यांच्यासहित संयुक्तिक पाहणी दौरा केला. यात सदस्यांनी घटनास्थळावर असलेल्या अपघातग्रस्त बसची बारकाईने पाहणी करून निरीक्षण नोंदवून घेतली. तसेच यात कोणती चूक झाली, आता याचा शोध शास्त्रीयदृष्ठ्या घेतला जात आहे.

- Advertisement -

आपत्कालीन यंत्रणांची मदत कधी व कशी पोहचली? अपघात नेमका कसा झाला? रस्ते सुरक्षामध्ये नेमकी बसमध्ये किती प्रवासी होते? घटनेनंतर जखमींसाठी बचावकार्य कसे राबविले गेले? अपघातातील किती जखमी नागरिकांवर कुठे उपचार सुरू आहेत? तसेच मृतांपैकी किती प्रवाशांची ओळख पटली? आदींबाबत तपशीलवार माहिती आडगाव पोलिसांकडून जाणून घेतली व संपूर्ण घटनाक्रम जाणून घेतला. या पाहणी दौर्‍यात अनेक त्रुटी आढळून आल्या असून, अपघातग्रस्त बस कंपनी चिंतामणी ट्रॅव्हल्सकडूनही वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून व्यवसाय सुरू असल्याचे धक्कादायक बाबी यात पुढे आल्याची समजते. त्याबरोबरच चौकाच्या आजूबाजूचे अतिक्रमण, अरुंद रस्ता, टर्निंग पॉईंट, सिग्नल यंत्रणा, चौकातील रस्त्याचे रुंदीकरण अशा अनेक बाबी देखील आढळून आले आहे. याबाबत सविस्तर अहवाल काही दिवसात सादर होईल. मात्र, या अपघात केंद्र ठरलेल्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -