घरक्राइमवडिलांच्या वियोगातून एकुलत्या एक मुलाची आत्महत्या

वडिलांच्या वियोगातून एकुलत्या एक मुलाची आत्महत्या

Subscribe

मुंबई नाका भागातील धक्कादायक घटना, मातेवर कोसळला दुःखाचा डोंगर

नाशिक : इमारतीच्या दहाव्या मजल्यावरुन उडी घेत तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.१३) सकाळी ८ वाजेदरम्यान घडली. तीन वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाल्यापासून तो तणावाखाली होता. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. आर्य मिलिंद क्षत्रिय (वय १९, रा. गोविंद हाईट्स, गोविंदनगर, नाशिक) असे मृत तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यच्या वडिलांचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले. त्यातून तो ताणतणावाखाली असायचा. त्याने काही दिवसांपूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. गोविंद हाईट्समध्ये तो आईसोबत राहत होता. सोमवारी सकाळी आईला सांगून तो घराबाहेर गेला. त्यानंतर त्याने इमारतीच्या दहाव्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जिल्हा रुग्णालयात नेल्यानंतर वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करत आर्यला मृत घोषित केले.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -