घरमहाराष्ट्रपुणेभाजपा आणि आरएसएसच्या आदेशाने आमच्यावर कारवाई, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा आरोप

भाजपा आणि आरएसएसच्या आदेशाने आमच्यावर कारवाई, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा आरोप

Subscribe

पुणे – राज्यभरात आमच्या संघटनेच्या 20 नेत्यांना अटक करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या आदेशाने एनआयएने आमच्यावर ही कारवाई केली आहे. आमचा विनाकारण छळ सुरू असून आमच्या नेत्यांना 4 ते 5 वर्षे तुरुंगात टाकून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत. आम्हाला या देशाचे नागरिक म्हणून सन्मानाची वागणूक मिळत नसल्याची टीका पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे पुणे जिल्हाध्यक्ष मोहम्मद खैर शेख यांनी केली आहे.

 पुणे जिल्हाध्यक्ष मोहम्मद खैस शेख काय म्हणाले –

- Advertisement -

पुण्यातील दोघांसह राज्यातून एकूण २० जणांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केली आहे. कोणतेही चुकीचे कृत्य केले नसताना आमच्या पदाधिकाऱ्यांना लक्ष्य केले जाते. त्यांना 4-5 वर्षे तुरुंगात टाकून आयुष्य उद्ध्वस्त केले जाते. आमच्या संघटनेची स्थापना २००७ मध्ये झाली. २०१४ पर्यंत आमच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. २०१४ला भाजपची सत्ता आल्यापासून विनाकारण लक्ष्य केले जात आहे. करोना काळात आमच्यावर परदेशांतील देणग्यांवरून अंमलबजावणी ईडीने छापा टाकला. आमची सर्व कागदपत्रे तयार होती, त्यामुळे ईडीला पुढे कारवाई करता आली नाही. आता एनआयए आमच्या संघटनेच्या कार्यालयांवर धाडी टाकत आहे. आम्ही याचा निषेध करतो. आम्हाला दहशतवाद्यांसारखी वागणूक मिळत आहे. आम्ही या देशाचे नागरिक आहोत, आम्हाला सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे.

कोंडव्यात पीएफआयचे कार्यालय नाही –

- Advertisement -

कोंढव्यात ज्या ठिकाणी एनआयएने छापा टाकला, ते पीएफआयचे कार्यालय नाही. संस्थेकडून कार्यक्रमावेळी ठराविक वेळेसाठी हॉल भाड्याने घेतला जातो. त्या हॉल मालकालाही एनआयएने दमदाटी केली आहे. दोन महिन्यांपूर्वी केसरबाग परिसरात कार्यालय सुरू केले आहे, असेही शेख म्हणाले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -