घरमहाराष्ट्र४० डोक्यांच्या रावणाने प्रभू श्रीरामाचं धनुष्यबाण गोठवलं; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल

४० डोक्यांच्या रावणाने प्रभू श्रीरामाचं धनुष्यबाण गोठवलं; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल

Subscribe

मुंबई – ४० डोक्याच्या रावणाने प्रभू श्रीरामाचं धनुष्यबाण गोठवलं, असा हल्लाबोल शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. आज त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना स्थापनेचा इतिहास आणि मधल्या काळात शिवसेनेवर आलेल्या संकटांचा तपशील दिला. त्याचसोबत, त्यांनी एकनाथ शिंदे गटावरही निशाणा साधला.

निवडणूक आयोगाने निर्णय दिला. त्यांनी शिवसेनेचं नाव गोठवलं, चिन्ह गोठवलं आहे. शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे धनुष्यबाणाची मनोभावे पूजा करत असत. आजही पूजा केली जाते. पण ४० डोक्याच्या रावणाेन प्रभू श्रीरामाचं धनुष्यबाण आज गोठवलं, असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला.

- Advertisement -

हेही वाचा – दिवस आणि रात्र वैऱ्याची आहे, जागे राहा, आत्मविश्वासाने मोठी लढाई लढूया; उद्धव ठाकरेंचा निर्धार

शिवसेनेसोबत असं वागण्यासाठी थिजलेली मनं आणि गोठलेलंच रक्त पाहिजे. कारण शिवसेनेसाठी सळसळतं आणि तापलेलं रक्त पाहिजे. उलट्या काळजाची ही माणसं आणि त्यांचा कंपू फिरतोय याचं दुःख होतंय. ज्या शिवसेनेनं तुम्हाला राजकीय जन्म दिला. शिवसेना ही आई आहे. पण उलट्या काळजाच्या लोकांनी शिवसेना हे नाव गोठवलं. त्यांना आनंदाच्या उकाळ्या फुटत असतील. पण त्यापेक्षा त्यांच्यामागे जी शक्ती आहे त्यांना आनंदाच्या उकाळ्या फुटत असतील. मराठी माणसांचं मनं जपली, त्यांचंच नाव गोठवलं, काय मिळणार तुम्हाला, असा प्रश्न ठाकरे यांनी विचारला आहे.

- Advertisement -


जे नाव आजोबांनी दिलं, वडिलांनी रुजवलं, तेच नाव मी पुढे घेऊन जात असताना तुम्ही घात करताय. तुमचा अधिकार काय, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

आता अती होतंय

कोरोना काळात येऊन मी सूचना करत होतो. माझ्या सूचनांचं पालन करून आपण कोरोना काळावर मात केली. संवाद सुरू असताना अनेकांनी मला सांगितलं की उद्धवजी तुम्ही आमच्या कुटुंबातील एक झालेले आहात. म्हणून मी आजही माझ्या कुटुंबाशी मनमोकळे करायला आलेलो आहे. यापूर्वी मी आपल्यासमोर आलो होतो तो शिवप्रमुखांचा पुत्र मुख्यमंत्री पदी नको म्हणून काहीजणांनी आपल्याशी गद्दारी केली तेव्हा. त्यावेळी मी वर्षा या शासकीय निवासस्थानाचा त्याग केला. आता त्याला दोन-तीन महिने झाले. मुख्यमंत्री पद ज्यांना पाहिजे होतं, त्यांनी ते घेतलं. ते घेऊनसुद्धा त्यांच्यात धुसफूस होते. नाराज असलेले गेले, आपण काही बोललो नाही अशातला भाग नाही, पण आपण सहन केलं. आता मात्र अती व्हायला लागलं आहे, असा आरोप उद्धव ठाकरेंनी आजच्या संवादादरम्यान केला.

दुसरा मेळावा पंचतारांकित

शिवसेना प्रमुखांचा पूत्र मुख्यमंत्री पदी नको हा हट्ट असू शकतो. पण आता स्वतः शिवसेना प्रमुख व्हायला निघाले आहेत. शिवतीर्थावर पारंपरिक दसरा मेळावा होऊ नये म्हणून खोकासुरांनी प्रयत्न केले. न्यायदेवता देवता या शब्दाला जागली आणि न्याय मिळाला. दसरा मेळावा अभूतपूर्व आणि अद्भूत झाला. दोन मेळावे झाले असं म्हणतात. पण मी आपल्या मेळाव्याला गेलो होतो. दुसरा मेळावा पंचतारांकित होता. पण आपला मेळाव्यात दिव्यांग होते, अंध होते. कसलीही सोय नव्हती. गाड्या नव्हत्या. अधरी भाकरी खाईन, उपाशी राहीन पण माझ्या शिवसेनेसाठी काहीही करेन, असं म्हणत अनेकजण शीवतीर्थावर आहे. या सर्वांना मनापासून धन्यवाद. ही परंपरा कालपर्वाची नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांचे आभार मानले.

उद्धव ठाकरे रमले भूतकाळात

उद्धव ठाकरे कोण, उद्धव बाळासाहेब ठाकरे. म्हणून मला किंमत आहे. या पक्षाचं प्रमुखपद स्विकारलं तेव्हा काही आठवणी दाटल्य होत्या. १९ जून १९६६ हा शिवेसनेचा स्थापना दिन. शिवाजी पार्कचं घर आताच्या भाषेत वन बीएचकेमध्ये एकत्रित कुटुंब राहायचं. घरी  मराठी माणसांची वर्दळ सुरू असायची. मार्मिकमधून शिवसेनाप्रमुख मराठी भाषिकांच्या होणाऱ्या अन्यायावर वाचा फोडण्यास सुरुवात केली. आजोबांनी विचारलं, एवढी गर्दी जमते, पुढे संघटना वगैरे काढणार आहेस की नाही. बाळासाहेबांनी लगेच होकार सांगितला. पण नाव काय ठरवलंस. तेव्हा शिवसेना हे नाव ठरवलं आजोबांनी सुचवलं. त्यानंतर हा संघर्ष सुरू झाला. हा इतिहास सुरू झाला. त्यावेळी कोणीही सोबत नव्हतं. पण गोरगरीब माणसं जिद्दीने आणि चिकाटीने उभी होती.

एकदा दत्ता साळवी आमच्या दारात हजर झाला. मी माझ्या नोकरीचा राजीनामा देऊन शिवसेनेत सामील होत असल्याचं त्यानं आम्हाला कळवलं. त्यावेळी नगरसेवक, महापौर, आमदार खासदारकी नव्हती. आपल्या भविष्याचं काय हणार, याचा विचार न करता, मराठी माणसाच्या विचारासाठी हा माणूस काहीतरी करू इच्छितो माझं कर्तव्य आहे, माझं कर्तव्य मी बजावणार, असं अनेकांना वाटत होतं. तिथून सुरुवात झाली. ठाणे पालिकेची निवडणूक आली. पहिलं यश शिवसेनेला ठाण्याने दिलं. वसंतराव मराठे हे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. सतीश प्रधानसह अनेकजण आले. श्रमले, मेहनत केली त्यातून शिवेसनेचा विजयाचा रथ पुढे निघाला. मुंबई पालिका आली. त्यातून शिवसेनेचे ४२ निवडून आले. काही वेळेला संकटं आली. प्रत्येक संकटात जीवाची बाजू लावून शिवसैनिक लढत राहिला. अनेकजण असे आहेत ज्यांनी जीवसुद्धा गमावले आहेत. तुरुंगवास भोगला, पोलिसांचा अत्याचार सहन केला. हे करत करत मोडेने पण वाकणार नाही. ही भावना बाळासाहेबांनी मराठी माणसांच्या धमन्यांमध्ये रुजवली, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -