घरठाणेसावरकर-गोळवलकर चुकले म्हणून माफी मागणार का?; डॉ. जितेंद्र आव्हाडांचा भाजपला टोला

सावरकर-गोळवलकर चुकले म्हणून माफी मागणार का?; डॉ. जितेंद्र आव्हाडांचा भाजपला टोला

Subscribe

Jitendra Awhad | अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराजे धर्मवीर नव्हते तर स्वराज्य रक्षकच होते, असं रोखठोक वक्तव्य केलं. त्यानंतर भाजप आणि शिंदे गटानं तात्काळ आक्षेप घेतला. तर आंदोलनंही सुरू झाली आहेत. त्यावरुन डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी ऐतिहासिक दाखले देत अजितदादांवर टीका करणार्‍यांवर चांगलीच आगपाखड केली.

ठाणे – अजितदादांनी माफी मागावी, अशी मागणी करणार्‍या भाजपच्या लोकांनी सावरकर आणि गोळवलकर चुकले आहेत. त्याबद्दल आधी माफी मागा. आमचे राजे काय स्त्री लंपट होते का? असा सवाल करीत शिवपुत्र संभाजी राजे यांना स्त्री लंपट आणि दारुड्या म्हणणार्‍यांना आपण आपले आदर्श मानत आहात; त्यांच्याबद्दल आपले काय म्हणणे आहे? हे अजितदादांवर टीका करणार्‍यांनी जाहीरपणे सांगावे, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिले. तसेच, कमी माहितीच्या आधारावर आपण जेव्हा एखाद्याला कोंडीत पकडायला जातो. तेव्हा तो कोंडीत पकडला जात नाही. तर, इतिहासाची पाने बाहेर येतात. जर, सगळं शांत असतं तर आम्ही गोळवलकर आणि सावरकर यांचीही पाने बाहेर काढलीच नसती, असेही ते यावेळी म्हणाले.

हेही वाचा अभ्यास न करता प्रतिक्रिया देऊ नये; अजित पवारांवर संभाजीराजे संतापले

- Advertisement -

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराजे धर्मवीर नव्हते तर स्वराज्य रक्षकच होते, असं रोखठोक वक्तव्य केलं. त्यानंतर भाजप आणि शिंदे गटानं तात्काळ आक्षेप घेतला. तर आंदोलनंही सुरू झाली आहेत. त्यावरुन डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी ऐतिहासिक दाखले देत अजितदादांवर टीका करणार्‍यांवर चांगलीच आगपाखड केली.

डॉ. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, गेले काही दिवस छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत वापरल्या जाणार्‍या स्वराज्यरक्षक आणि धर्मवीर या शब्दांवरुन बरीच वादावादी झालेली आहे. खरंतर निष्कारण हा वाद काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी राजे हे शिवरायांच्या निधनानंतर राजगादीवर बसले. अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या परंपरेनुसारच ते पुढे जाणार होते. याबाबत कोणाच्याही मनात शंका असता कामा नये. छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्म ही संकल्पना महाराष्ट्र धर्म, मराठा धर्म आणि स्वराज्य असे निर्मिलेले होती. मराठा हा व्यापक शब्द होता; मराठा ही व्यापक संकल्पना होती अन् त्यामध्ये सर्व समाविष्ठ झाले होते. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या राज्याला रयतेचे राज्य असे म्हटले गेले होते. या रयतेच्या राज्याचे वारसदार छत्रपती संभाजी राजे हे होते. त्यामुळे ते कुठल्या एका धर्माच्या रक्षणासाठी बाहेर पडले, असे कोणतेही ऐतिहासिक संदर्भ नाहीत.

- Advertisement -

समकालीन जेवढे इतिहासकार आहेत; त्यामध्ये जेवढे परकीय इतिहासकार आहेत; त्या सर्वांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल खूप चांगले लिहून ठेवले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी दोन राज्याभिषेक करून घेतले, असे इतिहासकार प्रा. शरद पाटील यांनी सांगितले आहे. शाक्त म्हणजे काय तर, स्त्रीप्रधान संस्कृतीचा आदर करणे! छत्रपती संभाजी महाराज हे शाक्त परंपरेचे-संस्कृतीचे अभ्यासक होते. त्यामुळे ते स्वराज्य रक्षक होते. या स्वराज्यात आपण सगळेच आलो आहोत. स्वराज्य हे जात-धर्म विरहित होते. ते स्वराज्य रक्षक होते म्हणजेच ते सर्वांचेच रक्षण करायचे ना? कोणत्याही प्राचीन किंवा समकालिन इतिहासकाराने त्यांना धर्मवीर असे कुठेही म्हटलेले नाही. स्वराज्याचे रक्षण ही छत्रपती शिवाजी महाराजांची भावना होती; तीच भावना छत्रपती संभाजी महाराजांचीही होती. जी परंपरा छत्रपती शिवाजी महाराजांनी चालविली; तीच परंपरा छत्रपती संभाजी महाराजांनीही चालविली, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

हेही वाचा भाजपाचे पुन्हा पंकजा मुंडेंकडे दुर्लक्ष? जे. पी. नड्डांच्या कार्यक्रमाचे निमंत्रणच नाही!

अजितदादांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपने केली आहे, याबद्दल पत्रकारांनी विचारले असता, कसली माफी? असा प्रश्न उपस्थित करुन, त्यांनी माफी मागावी. सावरकर चुकले आहेत, मागा माफी! गोळवलकर चुकले म्हणून माफी मागा. स्त्री लंपट आणि दारुडे होते आमचे राजे? हिमंत आहे, या पानांवर माझ्याशी वाद घालायचा? हे पुरावे त्यांच्याच पुस्तकातले आहेत ना, असा प्रतिप्रश्न डॉ. आव्हाड यांनी उपस्थित केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -