घरमुंबईशस्त्रांनी भरलेली बोट रायगड समुद्रकिनारी आलीच कशी? भाजप नेत्याने उपस्थित केला प्रश्न

शस्त्रांनी भरलेली बोट रायगड समुद्रकिनारी आलीच कशी? भाजप नेत्याने उपस्थित केला प्रश्न

Subscribe

रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर किनाऱ्यावर काही दिवसांपूर्वी दोन संशयास्पद बोटी आढळल्या होत्या. एका बोटीत रायफल आणि एके ४७ सापडले होते तर, दुसऱ्या बोटीत फ्रीजमध्ये जेवणाचे सामान सापडले होते. यावरून भाजपा नेते निलेश राणे यांनी संशय निर्माण केला आहे. दुसऱ्या बोटीत सापडलेल्या जेवणाच्या सामानुसार तिथे नुकतंच कोणीतरी खाऊन पिऊन निघाले होते. ते कोण होते, किती होते, याची कल्पना नाही, असं निलेश राणे म्हणाले आहे.

निलेश राणे म्हणाले की, “मला परत-परत संशय येतोय की ते गेले कुठे? कसे गेले? काही अधिकाऱ्यांना निलंबित करून कोणी हे प्रकरण हलक्यात घेऊ नये. सरकारने याची गंभीरपणे दखल घ्यावी. रायफल आणि शस्त्रांनी भरलेली बोट रायगडमध्ये समुद्रकिनारी आलीच कशी? ‘रायगड जिल्ह्यामध्ये हरिहरेश्वरमध्ये बोट सापडली आहे. त्या बोटीवर कोण होते, त्यांच्याकडे काही सामान होते का, ते तिथून कुठे गेले याबद्दल कोणतीही माहिती नाही. ही फार गंभीरबाब आहे.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -