घरमुंबईभाजपला महाराष्ट्राचे तीन तुकडे करायचेत; संजय राऊत यांचा आरोप

भाजपला महाराष्ट्राचे तीन तुकडे करायचेत; संजय राऊत यांचा आरोप

Subscribe

विरोधकांवर मात्र कारवाई होते. माझ्यावरही झाली आहे. त्यामुळे आम्ही सर्व मुश्रीफ यांच्या पाठिशी आहोत. मुश्रीफ हे संघर्ष करणारे नेते आहेत. लढवय्ये आहेत. त्यामुळे ते या संकटातून नक्कीच बाहेर येतील, असा दावा खासदार राऊत यांनी केला.

मुंबईः भाजपला महाराष्ट्राचे तीन तुकडे करायचे आहेत. त्यासाठी त्यांनी शिवसेना फोडली. मात्र शिवसेना असेपर्यंत हे शक्य होणार नाही, असे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी सांगितले.

दै. सामनामधील अग्रलेखावरून खासदार राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, महाविकास आघाडीमुळे बाहेर पडलो. शरद पवार व राष्ट्रवादी काॅंग्रेसमुळे बाहेर पडलो हे शिंदे गटाचे दावे कसे खोटे आहेत हे भाजपचे मंत्री गिरीष महाजन यांच्या वक्तव्यामुळे स्पष्ट झाले आहे. शिवसेना फोडणे हे भाजपचे मिशन होते. ते आम्ही पूर्ण केले, असे मंत्री महाजन यांनी जळगाव येथील एका कार्यक्रमात सांगितले. त्या कार्यक्रमाला स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थितीत होते. भाजपमधील कोणत्या तरी नेत्याच्या तोंडून सत्य बाहेर आले आहे, असे खासदार राऊत यांनी सांगितले.

- Advertisement -

भाजपला महाराष्ट्राचे तीन तुकडे करायचे आहेत. त्यासाठीच त्यांनी शिवसेना फोडली. मात्र शिवसेना असेपर्यंत भाजपला हे शक्य होणार नाही, असे खासदार राऊत यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर सुरु असलेल्या कारवाईवरही खासदार राऊत यांनी भाष्य केले. ते म्हणाले, मुश्रीफ यांना अटक होणार, असे भाजपमधील काही नेते म्हणाले होते. त्यानुसार ही कारवाई सुरु आहे. भावना गवळी, यशवंत जाधव यांनाही तपास यंत्रणेच्या नोटीसा आल्या होत्या. त्यांना नंतर क्लिन चीट मिळाली. विरोधकांवर मात्र कारवाई होते. माझ्यावरही झाली आहे. त्यामुळे आम्ही सर्व मुश्रीफ यांच्या पाठिशी आहोत. मुश्रीफ हे संघर्ष करणारे नेते आहेत. लढवय्ये आहेत. त्यामुळे ते या संकटातून नक्कीच बाहेर येतील, असा दावा खासदार राऊत यांनी केला.

- Advertisement -

मुस्लिमांपासून देशाला धोका नाही, असे वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. त्यावर खासदार राऊत म्हणाले, भागवत यांच्या भूमिकेचे स्वागतच आहे. या भूमिकेचा भाजप नेत्यांनी विचार करायला हवा. कारण राजकारणासाठी हिंदू- मुस्लिम द्वेष पसरवला जात असेल तर देशाची फाळणी होईल.

 

 

 

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -