घरमुंबई'विकास हरवला आहे'; आव्हाड यांनी दिली जाहिरात

‘विकास हरवला आहे’; आव्हाड यांनी दिली जाहिरात

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा सोशल मीडियावरून भाजपला टोला लगावला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांचे एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु असतानाच काही नेते खोचक टीकांसह विरोधकांच्या कोपरखळ्या घेतानाही दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड हे वारंवार त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट, व्हिडिओ अथवा वक्तव्यावरून सत्ताधारी भाजपावर टीका करताना दिसतात. आता तर त्यांनी चक्क विकास हरवला आहे, अशी जाहिरातच देऊन टाकली आहे. भारतीय जनता पक्षाची २०१४ सालची टॅग लाईन ‘विकास’ याची आव्हाड यांनी खिल्ली उडवली आहे. ‘सबका साथ, सबका विकास’, या मुद्द्यावर भाजपने २०१४ साली सत्ता मिळवली होती. मात्र आता पाच वर्षानंतर या विकासाचा शोध घेतला जात असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरील पोस्टमध्ये नमूद केले आहे.

- Advertisement -

काय म्हटलंय ट्वीटमध्ये 

आपला लाडका विकास (भाजपने दिलेले विकासाचे आश्वासन) हे गेल्या ५ वर्षांत झालेच नसून अंगात भगवा शर्ट आणि हाफपॅन्ट (भाजपचे भगवे झेंडे आणि आरएसएसची हाफपॅन्ट असा एकत्र पेहराव) २०१४ पासून म्हणजेट सत्तेत आल्यापासून बेपत्ता आहे. तसेच हा विकास सापडल्यात भारतीय जनता पक्षालाच संपर्क साधावा, असे आवाहनही जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -