घरताज्या घडामोडीKirit Somaiya: ठाकरे कुटुंबाचा आणखी एक घोटाळा उद्या बाहेर आणणार - किरीट...

Kirit Somaiya: ठाकरे कुटुंबाचा आणखी एक घोटाळा उद्या बाहेर आणणार – किरीट सोमय्या

Subscribe

तुम्हाला उद्या एक नमुना बघायला मिळेल, ठाकरे परिवाराचा घोटाळा समोर ठेवणार आहे, घोटाळेबाजांवर कारवाई होणारच अशा शब्दात किरीट सोमय्या यांनी आणखी एक घोटाळा उघडकीस आणण्याचे आव्हान दिले आहे. विक्रांत युद्धनौका बचाव प्रकरणात माझ्यावर झालेल्या आरोपांवर न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. घोटाळ्याचा ५८ कोटींचा आकडा कुठून आला आहे, अशी विचारणा कोर्टानेही केली. त्यावर ठाकरे सरकार गप्प का ? असेही ते म्हणाले. घोटाळा झाला म्हणून दहा वर्षानंतर आकडा ठेवतात. पोलीस ४२० कलमाखाली एफआयआर दाखल करतात अन् प्रेस नोट काढतात. हा १० वर्षानंतर कुठून घोटाळा आणला असाही सवाल किरीट सोमय्या यांनी केला. गेल्या तीन महिन्यात ठाकरेंनी १० वेळा नौटंकी केली. जेव्हा जेव्हा ठाकरे सरकारच्या मंत्री आणि नेत्यांवर कारवाई झाली तेव्हा असे स्टंट झाल्याचे किरीट सोमय्या म्हणाले. आयएनएस विक्रांत बचाव निधी घोटाळ्याच्या प्रकरणात कोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

तीन महिन्यात १० वेळा नौटंकी

ठाकरे सरकारच्या नेत्याचा घोटाळा बाहेर काढले तेव्हा तेव्हा माझ्यावर आरोप करण्यात आले. किरीट सोमय्यांनी ७५०० कोटी अमित शहांना दिले एकही कागद देण्यात आला नाही. पंतप्रधानांना मोठे पत्र लिहिले की चार ईडी ऑफिसर आणि किरीट सोमय्या घोटाळा करतात. त्यानंतर एसआयटीही नेमली आता दोन महिन्यांनंतरही काहीही झालेले नाही. वसईच्या कंपनीत ४५० कोटी वाधवान यांनी टाकले, पण हेदेखील सिद्ध करता आले नाही. पालघरच्या कंपनीत २६० कोटी ईडीने टाकले. राकेश वाधवान पार्टनर आहे, त्यामध्येही काहीही सिद्ध झाले नाही. जुहू १०० कोटी जमीन घोटाळा, पवईचा ४३५ कोटींचा पीएपी घोटाळा या प्रकारे ठाकरे सरकारने मांडले. हे एक डझन घोटाळ्याचे आरोप करताना दगड मारायचा आणि पुढे जायचे इतक सोप उद्धव ठाकरेंना वाटते का ? आता ५८ कोटींचा घोटाळ्याचा आरोप केल्यावर हिशोब द्यावाच लागेल. होम वर्कसाठी नॉट रिचेबल होतो. नॉट रिचेबल काही व्यक्तींसाठी होतो. पण उद्या शुक्रवारी नमुना पहायला मिळेल. महाराष्ट्राच्या जनतेला प्रॉमिस करतो की ठाकरे सरकारचा आणखी एक घोटाळा समोर ठेवणार आहे.

- Advertisement -

कोणाकोणाची संपत्ती जप्त ?

संजय राऊत अडीच समन्सनंतर ईडी चौकशीला गेले होते. हे पहिल असे सरकार असेल ज्यामध्ये एक डझन नेत्यांच्या मालमत्ता या ईडीने जप्त केल्या आहेत. उद्धव ठाकरेंचा मेव्हणा श्रीधर पाटणकरची प्रॉपर्टी जप्त झाली. नवाब मलिक स्वतः जप्त झाले आणि प्रॉपर्टीही जप्त झाली. संजय राऊतांची प्रॉपर्टी जप्त झाली. अनिल देशमुख, प्रताप सरनाईक, भावना गवळी, आनंद अडसूळ, अजित पवार, यशवंत जाधव, हसन मुश्रीफ, अनिल परब, सुजित पाटकर, सदानंद कदम घोटाळेबाज सरकारचा यापेक्षा आणखी काय मोठा पुरावा हवा ?

माफीया सरकार आणि नेत्याची लूट समोर येत आहे आणि त्यावर कारवाई होत आहे. महाविकास आघाडी सरकारला भीती वाटणे तर स्वाभाविक आहे. जी नावे वाचली ते घोटाळे सिद्ध झाले असून कोर्टानेही मान्यता दिली. परमवीर सिंह यांच्याविरोधातील सगळ्या केसेसे सीबीआयकडे गेल्या आहेत. शरद पवार अनिल देशमुख यांच्यासाठी दहावेळा कोर्टात वरखाली गेले. पण घोटाळा होता म्हणूनच प्रॉपर्टी जप्त झाली.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -