घरमुंबईमुंबईकरांनो पाणी जपून वापरा

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा

Subscribe

मुंबईतील सर्वच वॉर्डमध्ये या दुरुस्तीच्या कालावधीत दहा टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुढील काही दिवस मुंबईकरांना पाणी जपून वापरावे लागणार आहे. तसे आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आले आहे. मंगळवार ३ डिसेंबर ते सोमवार ९ डिसेंबर २०१९ या कालावधीत पिसे उदंचन केंद्रामध्‍ये न्‍युमॅटिक गेट सिस्टिमच्या दुरुस्‍तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. परिणामी मुंबईतील सर्वच वॉर्डमध्ये या दुरुस्तीच्या कालावधीत दहा टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पाण्याचा साठा करुन ठेवा

३ डिसेंबर ते ९ डिसेंबर २०१९ या कालावधीत संपूर्ण मुंबईत १० टक्के पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणून एक दिवस आधी नागरिकांनी पुरेसा पाणी साठा करुन ठेवावा असे सुद्धा पालिकेकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -