घरनवी मुंबईआळंदीला पायी वारी जाणार्‍या दिंडीत भीषण अपघात

आळंदीला पायी वारी जाणार्‍या दिंडीत भीषण अपघात

Subscribe

- भरधाव टेम्पो दिंडीत घुसला, - चार महिला वारकरी ठार, - २० ते २५ जण जखमी

श्री क्षेत्र आळंदीकडे चाललेल्या पायी दिंडी सोहळ्यात पिकअप गाडी घुसल्याने झालेल्या भीषण अपघातात चार महिला वारकर्‍यांचा मृत्यू झाला असून, दिंडीतील सुमारे २५ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास मुंबई-पुणे महामार्गावर कान्हे फाटा येथे घडला.

मंगळवारी असलेल्या आळंदीतील यात्रेसाठी खालापूर तालुक्यातील उंबरे, बीड, खालापूर, खोपोली, कर्जत गावातून माऊली कृपा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्री संत ज्ञानेश्वर महाराज पायी दिंडी सुरू होती. सोहळ्यातील २०० वारकरी शुक्रवारी रात्री नायगाव येथे मुक्कामी होते. शनिवार, २७ नोव्हेंबर रोजी ते सकाळी ही दिंडी मार्गस्थ होऊन ब्राह्मणवाडी येथे चहा, नाश्त्यासाठी पोहोचत असतानाच या भीषण अपघाताने दिंडीला गाठले. कान्हे फाट्याजवळ मुंबईकडून भरधाव वेगाने आलेली पिकअप गाडी या पायी दिंडीत घुसली आणि एकच हाहा:कार झाला. या अपघाताने अनेकजण रस्त्यावरच कोसळले.

- Advertisement -

तेथील रहिवासी अर्जुन कुंभार, संदीप कुंभार यांनी तातडीने जखमींना कामशेत येथील बढे हॉस्पिटल, महावीर हॉस्पिटल, सोमाटणे येथील पवना हॉस्पिटल, कान्हे फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात रवाना केले. तिथे अपघातग्रस्तांवर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले. मात्र, उपचाराआधीच चार महिलांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. अपघातात सविता येरम (उंबरे), सुरेखा चोरघे (बीड), संगीता शिंदे (सखोळ) आणि जयश्री पवार (भूतवली) यांचा मृत्यू झाला. अपघाताला कारण ठरलेल्या पिकअप वाहनाच्या चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -