भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) करारबद्ध केलेल्या भारतीय महिला खेळाडूंना पुरुष क्रिकेटपटूंप्रमाणे समान मानधन देण्याची घोषणा केली आहे. बीसीसीआयच्या या निर्णयावर भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरसह इतर महिला खेळाडूंनी ट्विट करून त्यांचे आभार मानले आहेत. (BCCI Indian Women Cricket Team equal match fee pay for men and women cricketers)
Truly a red letter day for Women’s Cricket in India with pay parity announced for women and men. Thank you @BCCI and @JayShah
— Harmanpreet Kaur (@ImHarmanpreet) October 27, 2022
कसोटी क्रिकेटमधील एका सामन्यासाठी पुरुष क्रिकेटर्सला 15 रुपये दिले जातात. तर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका सामन्यासाठी 6 लाख रुपये दिले जातात. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितले की, टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एका सामन्यासाठी पुरुष क्रिकेटर्स 3 लाख रुपये मानधन दिले जातात, त्याचप्रमाणे महिला क्रिकेटपटूंनाही तितकेच मानधन मिळणार आहे.
This is a historic decision for women’s cricket in India! The pay equity policy along with the WIPL next year, we are ushering into a new era for women’s cricket in India. Thank you @JayShah Sir & the @BCCI for making this happen. Really happy today. https://t.co/xOwWAwsxfz
— Mithali Raj (@M_Raj03) October 27, 2022
भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने गुरुवारी ट्विटरवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या करारबद्ध महिला क्रिकेटपटूंना त्यांच्या पुरुष समकक्षांप्रमाणेच सामना शुल्क देण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. बीसीसीआय आणि जय शाह यांचे आभार मानत त्यांनी ट्विटरवर लिहिले की, “भारतातील महिला आणि पुरुषांसाठी मॅच फीमध्ये समानतेची घोषणा हे खरोखरच कौतुकास्पद पाऊल आहे.”
What amazing news for Women’s cricket in India 👏👏 https://t.co/Mn4shzF05r
— Smriti Mandhana (@mandhana_smriti) October 27, 2022
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, बोर्डाच्या सर्वोच्च परिषदेने हा निर्णय स्वीकारला आहे. याआधी बीसीसीआयने आणखी एक ऐतिहासिक घोषणा केली होती की, महिला आयपीएलचा पहिला हंगाम पुढील वर्षी खेळवला जाईल.
Thankyou so much 🙏🏻 @BCCIWomen @JayShah https://t.co/O1AogiuRUy
— Sneh Rana (@SnehRana15) October 27, 2022
भारतीय महिला संघाची माजी कर्णधार मिताली राजने ट्विट केले की, भारतातील महिला क्रिकेटसाठी हा ऐतिहासिक निर्णय आहे. पुढील वर्षी WIPL पे इक्विटी पॉलिसीसह, भारतातील महिला क्रिकेटसाठी एका नवीन युगाची सुरुवात होईल. हे घडवून आणल्याबद्दल जय शहा आणि बीसीसीआयचे आभार.”
.@ImHarmanpreet reflects on a decision from the @BCCI that makes Indian cricket history!#BelieveInBlue pic.twitter.com/PBrLz4o12X
— Star Sports (@StarSportsIndia) October 27, 2022
सलामीवर स्मृती मानधनानेही ट्विट करून बीसीसीआयचे आभार मानले आहेत. स्टार गोलंदाज स्नेह राणानेही ट्विट केले आणि लिहिले की, जय शाह आणि बीसीसीआयचे आभार. बीसीसीआयच्या या निर्णयानंतर महिला क्रिकेटपटूंना पुरुष खेळाडूंइतकीच मॅच फी दिली जाणार आहे.
हेही वाचा – बीसीसीआयची मोठी घोषणा, पुरुष- महिला क्रिकेटर्सला मिळणार समान मानधन