टीम इंडिया आणि वेस्टइंडिज यांच्यामध्ये ६ फेब्रुवारीपासून एकदिवसीय मालिकेला सुरूवात होणार आहे. मात्र, धक्कादायक म्हणजे टीम इंडियावर पुन्हा एकदा कोरोनाचं सावट पसरलं आहे. टीम इंडियामधील शिखर धवन, ऋतुराज गायकवाड आणि श्रेयस अय्यर या फलंदाजांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच हे तिन्ही खेळाडू सध्या क्वारंटाईन आहेत.
NEWS ALERT: Shreyas Iyer, Shikhar Dhawan & Ruturaj Gaikwad have tested positive for Covid 19 ahead of the West Indies series.#INDvsWI
— CricTracker (@Cricketracker) February 2, 2022
वनडे आणि टी-२० मालिका खेळण्यासाठी वेस्टइंडिजचा संघ आज सकाळी अहमदाबादला पोहोचला आहे. वेस्टइंडिजचा कर्णधार कायरन पोलार्डच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडिज संघ अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. तसेच कोलकातामधील ईडन गार्डन्स स्टेडियमवर तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. परंतु टीम इंडियातील तीन खेळाडूंसह अन्य काही खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे सामना लांबवणीवर पडण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : Ramesh Deo Death: ते मला माझ्या मोठ्या भावासारखे, रमेश देव यांच्या निधनानंतर अशोक सराफ भावूक