गुरूवारी संपुर्ण दिवसभर मुंबईसह राज्यभरात आपल्या लाडक्या बाप्पाला गणेश भक्तांनी निरोप देण्यासाठी गर्दी केली होती. जल्लोषात सर्वच मुंबईतील घरगुती आणि सार्वजनिक मंडळाच्या बाप्पांना निरोप देण्यासाठी भक्तांची गर्दी पाहायला मिळाली. मात्र एकीकडे मिरवणुकीचा उत्साह असताना मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये गणपती विसर्जनाला गालबोट लागले. भोपाळमध्ये विसर्जनाच्यावेळी अनेक भक्तांवर मृत्यू ओढावल्याची घ़टना घडली.
Madhya Pradesh: 11 bodies recovered at Khatlapura Ghat in Bhopal after the boat they were in, capsized this morning. Search operation is underway. More details awaited. pic.twitter.com/mEMSJdzhE9
— ANI (@ANI) September 13, 2019
भोपाळमध्ये खटलापूरा मंदिर घाटवर शुक्रवारी सकाळी गणपती विसर्जनाकरिता काही गणेशभक्त बोट घेऊन निघाले होते. मात्र यावेळी बोटीवर जास्त लोक चढल्यामुळे ही बोट पाण्यात उल़टली. ही बोट उलटल्यानंतर जी दुर्घटनेत ९ जणांना वाचवण्यात यश आहे मात्र ११ लोक पाण्यात बुडाले. मात्र अजून काही लोक बेपत्ता असण्याची शक्यता आहे.