घरफिचर्सजागतिक आरोग्य संघटनेचे वाभाडे

जागतिक आरोग्य संघटनेचे वाभाडे

Subscribe

करोना हाताबाहेर जातोय आणि जागतिक आरोग्य संघटनाच त्यातली भागीदार असल्याचे उघड झाल्यावर कोणी ते स्पष्ट बोलायची हिंमत करत नव्हता, पण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प फटकळ असल्याने खुलेआम त्यांनी पहिला आरोप केला. आधी चीन व नंतर आरोग्य संघटनेलाही आरोपीच्या पिंजर्‍यात ट्रम्प यांनीच उभे केले, तर त्यांच्याच देशातही ट्रम्प यांची हेटाळणी झाली होती, पण हळुहळू हा वेडा काय म्हणतो, त्याकडे जगाला कान उघडे ठेवून बघावे ऐकावे लागले आणि आता करोनाची जागतिक तपासणी चौकशी करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. त्यातून अनेकांची अंडीपिल्ली बाहेर येतीलच, पण त्यासाठी अमेरिकेसारख्या दांडग्या देशालाही किती आक्रमक पवित्रा घ्यावा लागला ते विसरता कामा नये. अन्यथा हे पाप खपून गेले असते आणि चीनची मस्ती चालूच राहिली असती. मात्र, जागतिक आरोग्य संघटनाच एकमेव आरोपी वा गुन्हेगार नाही.

जागतिक आरोग्य संघटनेचे अखेरीस वार्षिक परिषदेत पुरते वाभाडे निघालेले आहेत. करोनाने घेतलेला तो सर्वात मोठा बळी मानावे लागेल. कारण करोनाचा जनक असलेल्या चीनला पाठीशी घालताना या संस्थेचा बळी गेलेला आहे. ज्या चौकशीचा प्रस्ताव नुकताच वार्षिक परिषदेत मंजूर करण्यात आला, ती चौकशी केवळ करोनाचा उगम वा त्यातली लपवाछपवी इतकीच मर्यादित नाही. त्यात विविध राजकीय हितसंबंधांचाही वेध घेतला जाणार आहे. कारण आरोग्य संघटनेची स्थापना ज्या हेतूने झाली होती, त्यालाच त्या संस्थेच्या विद्यमान नेतृत्वाने काळीमा फासला आहे. करोनाचा उद्भव झाल्यापासून त्याला यशस्वीरित्या पायबंद घालण्यात यश मिळवणार्‍या तैवान या देशाने त्यावर पहिला आवाज उठवला होता, पण ह्या संस्थेने त्याकडे कानाडोळा केला.

अधिक तैवानला त्या संस्थेच्या बैठकीत निरीक्षक म्हणूनही सहभागी करून घ्यायला नकार दिला होता. उलट त्याकडे वेळीच लक्ष दिले गेले असते आणि चीनमध्ये उद्भवलेल्या करोनाचा वेळीच तपास घेतला गेला असता, तर आज दिसते तसे जग उद्ध्वस्त होऊन पडले नसते. ते अन्य कोणाचे काम नसून आरोग्य संघटनेचे कर्तव्य आहे. त्यात अक्षम्य हेळसांड झालीच, पण तैवानने इशारा दिला असताना त्याचीच मुस्कटदाबी करण्याला संस्थेने प्राधान्य दिले. त्याचे कारण उघड आहे. तैवान हा कम्युनिस्ट चीनचा सर्वात इवला शत्रू आहे. ‘वन चायना’ ह्या धोरणानुसार चिनी नेतृत्वाच्या मते तैवान हा वेगळा देश नसून चीनचेच एक बेट आहे. त्यामुळे त्याला देश मानला जाऊ नये व त्याचे मुख्य भूमीत विलीनीकरण झाले पाहिजे. ही चीनची भूमिका असली तरी आरोग्य संघटनेची असू शकत नाही, याचे त्या संस्थेला भान उरले नाही, तिथेच सगळा घोळ होऊन गेला.

- Advertisement -

या संघटनेचे विद्यमान नेते व पदाधिकारी यांना पदावर आणून बसवण्यात चीनने आपली राजकीय ताकद पणाला लावलेली होती. अर्थात त्यात नवे काहीच नाही. यापूर्वीही अशा जागतिक संस्था संघटनांना आपल्या मुठीत ठेवायला रशिया अमेरिकेनेही तेच केलेले आहे. नाणेनिधी वा जागतिक बँक या संस्था अमेरिकेच्या इशार्‍यावरच चालत असतात आणि निर्णय घेत असतात. मग चीनने त्याच मार्गाने जाणे अयोग्य म्हणता येणार नाही, पण चीनने त्या संस्थांचा खर्चही उचलावा. बोजा अमेरिकेने उचलावा आणि तिथे सिंहासनावर आरुढ झालेल्यांनी अमेरिकेच्या विरोधातले फ़तवे काढण्यापासून अमेरिकेलाच वाकुल्या दाखवाव्या; असे चालणार नाही. इथे तर आरोग्य संघटनेने जगालाच खाईत लोटून देण्यापर्यंत चीनला साथ दिली आणि सर्वाधिक अनुदान देणार्‍या अमेरिकेलाही मरणाच्या जबड्यात ढकलून दिलेले आहे.

कारण तैवानसारख्या देशाने इशारा दिल्यावर या संस्थेने चीनमध्ये करोनाच्या फैलावाने मृत्यूचे तांडव चालविले असल्याची सर्वात पहिली दखल घेणेच त्या संस्थेचे कर्तव्य होते. जगात कुठलीही आजाराची साथ वा प्राणघातक आजार सरसकट फ़ैलावत जाऊ नये, याची देखरेख करण्यासाठीच या संघटनेची स्थापना झालेली होती आणि नेमक्या त्याच कर्तव्याला तिने यावेळी हरताळ फासलेला होता. तसा इशारा देण्यार्‍या तैवान देशाची मुस्कटदाबी केली आणि त्याच विषाणूविषयी लपवाछपवी करणार्‍या चीनला मोकाट रान दिले. त्यामुळेच अवघे जग गाफ़ील राहून करोनाच्या जबड्यात जाऊन घुसमटले. लाखो लोकांचा बळी गेला आहे आणि लक्षावधी आजारी पडले असून जगाची अर्थव्यवस्थाही कोलमडून पडली आहे. मग एकटा चीन जबाबदार कसा? गुन्हेगारीत साथ देणारा वा त्यावर पांघरूण घालणाराही तितकाच गुन्हेगार असतो ना?

- Advertisement -

अर्थात करोना हाताबाहेर जातोय आणि जागतिक आरोग्य संघटनाच त्यातली भागीदार असल्याचे उघड झाल्यावर कोणी ते स्पष्ट बोलायची हिंमत करत नव्हता, पण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प फटकळ असल्याने खुलेआम त्यांनी पहिला आरोप केला. आधी चीन व नंतर आरोग्य संघटनेलाही आरोपीच्या पिंजर्‍यात ट्रम्प यांनीच उभे केले, तर त्यांच्याच देशातही ट्रम्प यांची हेटाळणी झाली होती, पण हळुहळू हा वेडा काय म्हणतो, त्याकडे जगाला कान उघडे ठेवून बघावे ऐकावे लागले आणि आता करोनाची जागतिक तपासणी चौकशी करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. त्यातून अनेकांची अंडीपिल्ली बाहेर येतीलच, पण त्यासाठी अमेरिकेसारख्या दांडग्या देशालाही किती आक्रमक पवित्रा घ्यावा लागला ते विसरता कामा नये. अन्यथा हे पाप खपून गेले असते आणि चीनची मस्ती चालूच राहिली असती.

मात्र, जागतिक आरोग्य संघटनाच एकमेव आरोपी वा गुन्हेगार नाही. आजकाल जगात ज्या काही प्रतिष्ठीत संस्था, पुरस्कार वा ज्यांचा दबदबा आहे, अशा अनेक व्यक्ती संशयास्पद झालेल्या आहेत. त्यांनी आपले इमान विकून जगालाच गंडा घालण्याचा धंदा राजरोस चालू केलेला आहे. त्यात नोबेल, मॅगसेसे किंवा पुलित्झर अशा पुरस्कारांचाही समावेश आहे. जगाचे चिंतन करणार्‍या व जगाला विषाचेही डोस अमृत म्हणून दिवसाढवळ्या पाजणार्‍या थिंकटॅन्क मोकाट झालेल्या आहेत. त्यांचेही पितळ उघडे पडण्याची गरज आहे. कारण अशा पुरस्कार वा गाजावाजा करण्यातून जगाला संभ्रमात टाकण्याचा धंदा माजला आहे. अमूक पुरस्कार मिळाला म्हणजे त्याच व्यक्तीचे पाखंड सुरू केले जात असते आणि त्याच्या माध्यमातून अब्जावधी लोकांना चक्क उल्लू बनवले जात असते. त्यांनाही यापुढे धारेवर धरण्याची गरज आहे.

करोनाचा पुढल्या काळात पराभव होऊन मानवजात त्यातून सावरून उभी राहील यात शंकाच नाही, पण तेव्हाचे जग कालच्या जगासारखेच तंतोतंत असणार नाही. त्याचा चेहरामोहरा आमुलाग्र बदललेला असेल. त्याचे नेतृत्व करणारे चेहरे साफ़ बदलून गेलेले असतील. त्या नेतृत्वाचे स्वरूपही आजच्यापेक्षा बदललेले असेल. श्रीमंत वा शस्त्रसज्ज असलेले देश वा त्यांच्या बळाचा वापर करून पुढाकार घेणारे नेतृत्व मागे पडलेले असेल. मानवी जगाला संकटातून वाचवणारा व मदतीचा हात निर्भेळ मनाने देणारा समाज वा नेता, जगाचे नेतृत्व करायला पुढे आलेला असेल. जगाचे नेतृत्व कसे हवे त्याची आज कठोर परीक्षा चालू आहे आणि त्यात ब्राझील, अमेरिकेने मत दिलेले आहे. जपान इस्रायल आधीच भारताचे समर्थक झालेले आहेत, पण करोना विरुद्धच्या युद्धात जगभरच्या देशांना भारताने योग्य उदाहरण घालून दिलेले आहे.

अर्थव्यवस्था, उद्योग वा व्यापारापेक्षाही माणूस आधी जगवला पाहिजे आणि तो जगवला तर नवी अर्थव्यवस्था उभारता येईल, हा नव्या जगासाठीचा साक्षात्कार आहे. चीन असो वा अमेरिका वा पाश्चात्य देश असोत; त्यांना माणूस व अर्थकारण यातून योग्य निर्णय घेता आले नाहीत किंवा समतोल राखता आलेला नाही. त्याचे दुष्परिणाम सर्वांना भोगावे लागत असताना कोट्यवधी लोकांना जगवण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेला वसा, करोनानंतरच्या जगासाठी उद्धाराचा नवा मार्ग असणार आहे. तो जगाची राजकीय भौगोलिक आर्थिक रचना बदलून टाकणार आहे. जनतेचा नेता कसा असावा आणि संकटकाळात सेनापती कसा असावा, त्याचा वस्तुपाठच भारताकडून जगाला दिला जातो आहे. २०२१ सालातले जग कसे असेल?

Santosh Malkarhttps://www.mymahanagar.com/author/msantosh/
आपलं महानगर मुंबई आवृत्ती निवासी संपादक. गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -