घरमहाराष्ट्रनाशिकहरणबारी धरणात बुडून १६ वर्षीय युवकाचा मृत्यू

हरणबारी धरणात बुडून १६ वर्षीय युवकाचा मृत्यू

Subscribe

जायखेडा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

तुषार रौंदळ : विरगाव
बागलाण तालुक्यातील हरणबारी धरणात घरच्या गुरांना पाणी पाजण्यासाठी मित्रांसोबत शुक्रवारी (दि.३) दुपारच्यावेळी गेलेल्या हतनुर येथील १६ वर्षीय युवक अर्जुन विष्णु देशमुख धरणात पोहण्यासाठी उतरला असता धरणातील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडुन मृत्यू पावल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी जायखेडा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मित्रांसोबत आपल्या गुरांना पाणी पाजण्यासाठी अर्जुन हरणबारी धरणावर गेला होता. दुपारच्या सुमारास त्याला धरणातील पाण्यात पोहण्याचा मोह झाला. पाण्यात पोहत असतांना खोल पाण्याचा अंदाज न आल्यामुळे अर्जुनला पाण्यातून वरती येता येत नसल्याने त्याच्या मित्रांनी ही घटना गावातील नागरीकांना सांगितली असता नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन युवकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध लागला नव्हता. अखेर घटनास्थळी जायखेडा ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे, तहसीलदार जितेंद्र इंगळे यांच्यासह बचाव पथक दाखल झाले होते. आज शनिवार (दि.४) रोजी सकाळी अर्जुनचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.
Saiprasad Patil
Saiprasad Patilhttps://www.mymahanagar.com/author/sppatil/
गेल्या १३ वर्षांपासून नाशिकमध्ये पत्रकारितेचा अनुभव. सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, गुन्हेगारी यासह विविध विषयांवर लिखाण. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक स्तरावरील घडामोडींवर लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -