बुलढाण्याच्या मलरापूरमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये १३ जण जागीच ठार तर ३ जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. मलकापूर नॅशनल हायवे ६ वर असलेल्या एका कारखान्यासमोर ट्रक आणि टाटा मॅजिकचा भीषण अपघात झाला आहे. नाशिकमधील सप्तश्रृंगी गडावरून परतणाऱ्या भाविकांच्या अपघाताची बातमी ताजी असतानाच आणखी एक भीषण अपघात राज्यात घडला आहे. नाशिकच्या अपघातात ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
जबरदस्तीने प्रवासी गाडीत बसवण्यात आले
आज, सोमवारी दुपारच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ४ चाकी वाहनातील १३ जण जागीच ठार झाले असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. गाडीमध्ये १२ प्रवासी होते. खरंतर चारचाकी असल्यामुळे १२ प्रवाशांची जागा नव्हती. पण जबरदस्तीने प्रवासी गाडीत बसवण्यात आले होते, अशी माहिती स्थानिकांकडून देण्यात आली आहे. हायवे मार्गावर अपघात झाल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. स्थानिकांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. रस्त्याच्यामध्ये असलेली अपघाती वाहनं बाजुला करण्याचं काम पोलिसांकडून करण्यात येत आहे.