मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, असे देवेंद्र फडणवीस 2019 च्या निवडणुकीवेळी म्हणाले होते. हा डायलॉग त्यांच्या नावा सोबत जोडला गेला आहे. या डायलॉगवरून त्यांना हिणवले गेले. मात्र, त्याचा डायलॉग खरा ठरताना दिसत आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयत पाटील यांना विचारले असता त्यांनी मी नंतर बोलने…, असे म्हणत कोटी करण्यात प्रयत्न केला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंनी ज्यांना आमदार केले, त्यांनीच भूमिका बदलल्यामुळे सर्व न पटणारे, आहे अशी टीका जयंत पाटील यांनी केली.
आमदार मुंबईत आहेत ते शरद पवार यांना भेटायला येणार आहेत. विरोधी पक्षनेते याबाबत अजून तरी विचार झालेला नाही. लवकरच आम्ही एकत्र बसुन निर्णय घेऊ. मुख्यमंत्री राजीनामा देतील असा साधरण अंदाज होता. तसे काल घडले. ज्यांना उद्धव ठाकरेंनी आमदार केले त्यांनीच भुमिका बदलल्यामुळे हे सर्व न पटणारे आणि दुर्दैवी आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याबद्दल शरद पवारांना माहित नव्हते –
उद्धव ठाकरे राजीनामा देणारे आहेत, याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना माहिती नव्हते. ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातुन घोषणा केली त्यावेळी मला आणि शरद पवार यांना माहिती मिळाली. शरद पवार यांना याचे आश्चर्य वाटले, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.