घरमहाराष्ट्रबाळासाहेबांच्या तैलचित्राचं अनावरण, उद्धव ठाकरेंची अनुपस्थिती?

बाळासाहेबांच्या तैलचित्राचं अनावरण, उद्धव ठाकरेंची अनुपस्थिती?

Subscribe

शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचा अनावरण सोहळा २३ जानेवारी रोजी पार पडणार आहे. विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात हा अनावरण सोहळा पार पडेल. मात्र या सोहळ्याला बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आमि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मात्र अनुपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र कुलाब्यातील रिगल सर्कल येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याला उद्धव ठाकरे सायंकाळी 7 वाजता उपस्थित राहणार असल्याचे ठाकरे गटाने गुरुवारी जाहीर केले आहे. हे दोन्ही कार्यक्रम एकाच वेळी होत असल्याने उद्धव ठाकरे तैलचित्र अनावरण सोहळ्याला गैरहजेरी लावण्याची शक्यता अधिक आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राचे अनावरण होणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री शिंदेंना पाठिंबा देणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांचे पुतणे निहार ठाकरे यांच्यासह संपूर्ण ठाकरे कुटुंबियांना आमंत्रित करण्यात आलं आहे. यासह केंद्रीय मंत्री, कॅबिनेट मंत्री, राज्याचे आमदार, खासदार तसेच क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे.

- Advertisement -

ठाकरे गटाने उद्धव ठाकरेंच्या जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, उद्धव ठाकरे सोमवारी सायंकाळी 7 वाजता कुलाबामधील सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. यानंतर सायनमध्ये ते पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीला संबोधित करतील. या दोन्ही कार्यक्रमांच्या वेळा जुळत नसल्याने उद्धव ठाकरे विधिमंडळाच्या समारंभाला उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे, परंतु कुलाब्याचे स्थळ विधानसभेच्या अगदी जवळ असल्याने ते उपस्थित राहू शकतील, असही ठाकरे गटातील पदाधिकाऱ्याने सांगितले.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची चार तैलचित्रे तयार असून मध्यवर्ती सभागृहात एकाची निवड होईल. हा एक अराजकीय कार्यक्रम आहे. यावेळी आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि त्यांनी महाराष्ट्रासह देशासाठी केलेल्या सेवेला आदरांजली अर्पण केली, असंही नार्वेकर म्हणाले.

- Advertisement -

मात्र शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तैलचित्रावरून शिंदे गटावर निशाणा साधला आहे. ते राजकारण खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. आमचे नेते उद्धव ठाकरे यांनी त्यांना आधीच बाप चोरणारी टोळी म्हटले आहे आणि त्यात तथ्य आहे. बाळासाहेब कोण होते हे महाराष्ट्रातील जनतेला सांगण्याची गरज नाही, तसे या निर्णयामागील राजकारण स्पष्ट करण्याची गरज नाही, तसेच या निर्णयामागील राजकारण स्पष्ट करण्याची गरज नाही, असही ठाकरे गटातील पदाधिकारी म्हणाले.


शिवाजी पार्कमध्ये ‘प्रजासत्ताक दिना’निमित्त मुंबई पोलिसांची जय्यत तयारी

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -