घरमनोरंजनकाय आहे रणवीरच्या एनर्जीचे रहस्य? दीपिकाने लग्नानंतर केले उघड

काय आहे रणवीरच्या एनर्जीचे रहस्य? दीपिकाने लग्नानंतर केले उघड

Subscribe

बॉलीवूडमधील चर्चेचा विषय ठरलेली सर्वात प्रेमळ जोडी म्हणजे दीपिका आणि रणवीर. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये दिपवीरची ही जोडी लग्न बंधनात आडकली. लग्नानंतर बॉलीवूडमधील कलाकारांची रियल लाईफ कशी असते. याची उत्सुकता चाहत्यांमध्ये असते. नोव्हेंबर २०१८ मध्ये दीपिका-रणवीर लग्नाच्या बेडीत अडकले.  दिलेल्या एका मुलाखतीत लग्नानंतर रणवीरचे घरातील वागणे कसे आहे? यासोबतच रणवीरच्या एनर्जीचे रहस्य नेमके काय? असे विचारले असता दीपिकाने या संदर्भात खुलासा केला आहे.

हे वाचा – रणवीरचा अतिउत्साह; मात्र चाहत्यांची डोकेदुखी! 

- Advertisement -

त्याच्या एनर्जीचे रहस्य

यावेळी दीपिका म्हणाली, मी रणवीरला सकाळी ब्रेकफास्टच्यावेळी बदाम आणि नारळाचे पाणी देते. हेच त्याच्या एनर्जीचे रहस्य आहे. रणवीर सिंह हा बॉलीवूडमधील मोस्ट एनर्जेटिक अभिनेता मानला जातो. ऑफ स्क्रीन असो किंवा ऑन स्क्रीन त्याची एनर्जी तशीच तो कायम ठेवतो. रणवीरच्या एनर्जीचे रहस्य उलगडताना तिने असेही सांगितले की त्याच्याकडे अनेक चांगल्या गोष्टी आहेत.

रणवीर हा अतिशय वेगळा माणूस आहे. त्याच्या कामाच्याबाबतीत तो एकदम चोख असतो. तो शांत, संयमी असून बुद्धीमान आहे. ही त्याची एक बाजू असली तरी तो अत्यंत संवेदनशील आणि भावनिकसुद्धा आहे. तसेच त्याच्याकडे लहान मुलांसारखा निरागसपणा देखील आहे. त्यामुळे रणवीरकडे अनेक गोष्टी आहेत.

- Advertisement -

‘छपाक’ मधून दीपिका मोठ्या पडद्यावर

लग्नानंतर दीपिका पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकळ्याच्या तयारीत आहे. अॅसिड हल्ल्यातील पिडीत लक्ष्मी अग्रवाल यांच्यावर आधारित मेघना गुलजारच्या ‘छपाक’या चित्रपटाची तयारी करत आहे. तर रणवीर १९८३ साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारताच्या पहिल्या विजयावर आधारित कबीर खानच्या दिग्दर्शक ’83 हा चित्रपटासाठी तयारी करत आहे.

हे ही वाचा – दीपिकाचं चाहत्यांना खास ‘रिटर्न गिफ्ट’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -