देशात दिवसेंदिवस कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. मागील काही दिवसांपासून ३० हजारांहून अधिक नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे. गेल्या २४ तासांत देशात ३७ हजार १४८ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून ५८७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ११ लाख ५५ हजार १९१वर पोहोचला आहे. यापैकी आता २८ हजार ८४ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ७ लाख २४ हजार ५७८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या ४ लाख २ हजार ५२९ जणांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे. (सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)
Spike of 37,148 cases and 587 deaths reported in India in the last 24 hours.
Total #COVID19 positive cases stand at 11,55,191 including 4,02,529 active cases, 7,24,578 cured/discharged/migrated and 28084 deaths: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/iuKN63EYtV
— ANI (@ANI) July 21, 2020
२० जुलैपर्यंत देशात १ कोटी ४३ लाख ८१ हजार ३०३ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी काल ३ लाख ३३ हजार ३९५ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहे, अशी माहिती भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदने (ICMR) दिली आहे.
1,43,81,303 samples tested for #COVID19 up to 20th July. Of these 3,33,395 were tested yesterday: Indian Council of Medical Research (ICMR) pic.twitter.com/8PZaQrdzGt
— ANI (@ANI) July 21, 2020
देशात महाराष्ट्रातील कोरोना मृत्युदर सर्वाधिक आहे. रविवारी महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक ९ हजार ५१८ रुग्ण आढळून आले होते. यानंतर आता महाराष्ट्राचा मृत्युदरही देशात सर्वाधिक असल्याची बाब निदर्शनास आली आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे ११ हजार ८५४ नागरिक बळी पडले आहेत. सध्या राष्ट्रीय पातळीवरील कोरोनाचा मृत्यूदर २.४९ टक्के इतका आहे. मात्र, महाराष्ट्रात हाच दर ३.८२ टक्के आहे. राज्याच्यादृष्टीने ही अत्यंत चिंताजनक बाब असल्याचे सांगितले जात आहे. मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आला असला तरी राज्याच्या इतर भागांमधील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.
हेही वाचा – Corona: ब्राझीलमधील कोरोना बळींचा आकडा ८० हजार पार!