पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त देशांना शुभेच्छा दिल्या, यासोबतचं त्यांनी देशवासियांसाठी पाच संकल्पांची घोषणा केली आहे. या पाच संकल्पांवर बोलताना मोदी म्हणाले की, जेव्हा आपण आपलीच पाठ थोपटून घेतो तेव्हा आपल्या स्वप्नांपासून थोडे दूर राहतो. त्यामुळेच आपण कितीही संघर्ष केला तरीही आज आपण अमृतमय कालखंडात प्रवेश करत आहोत, तेव्हा आपल्या देशासाठी 25 वर्षे खूप महत्त्वाची आहेत. आज मी 130 कोटी देशवासियांना लाल किल्ल्यावरून बोलावतो. मित्रांनो, मला असे वाटते की येत्या 25 वर्षांसाठी देखील आपण त्या पाच संकल्पानांवर लक्ष केंद्रित केले पाहिजेत. 2047 मध्ये आपल्याला स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण होतील, तेव्हा पंचप्राणाच्या संदर्भात स्वातंत्र्यप्रेमींची सर्व स्वप्ने पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्याला उचलावी लागणार आहे. यानंतर मोदींना त्या पाच संकल्पांची माहिती दिली.
Elated to interact with our CWG 2022 contingent. Entire nation is proud of their outstanding achievements. https://t.co/eraViqKcnl
— Narendra Modi (@narendramodi) August 13, 2022
पंतप्रधान मोदींनी केलेले 5 संकल्प
पहिला संकल्प
आता देश मोठा संकल्प घेऊन जाणार आहे. खूप जिद्द घेऊन चालायचे आहे. यातील मोठा संकल्प म्हणजे विकसित भारत.
दुसरे संकल्प
आजही आपल्या मनात गुलामगिरीचा अंश कोणत्याही कोपऱ्यात असेल तर त्याला कोणत्याही परिस्थितीत टिकू दिला जाऊ देऊ नये. शेकडो वर्षे गुलामगिरीत जखडून ठेवलेल्या अवस्थेतून आता शंभर टक्के सुटका करावी लागेल.
तिसरा संकल्प
आपल्याला आपल्या वारस्याचा अभिमान असायला हवा. हा तो वारसा आहे ज्याने एकेकाळी भारताला सुवर्णकाळ दिला. या वारस्याचा आपल्याला अभिमान असायला हवा.
चौथा संकल्प
एकता आणि एकता. 130 कोटी देशवासीयांमध्ये एकता हवी. ना कोणी आपला ना कोणी परका. एकतेची शक्ती हा एक भारत श्रेष्ठ भारताच्या स्वप्नांसाठी आपला चौथा संकल्प आहे.
पाचवा संकल्प
नागरिकांचे कर्तव्य. ज्यामधून पंतप्रधानही बाहेर नाहीत, किंवा मुख्यमंत्रीही, तेही नागरिक आहेत. येत्या २५ वर्षांची स्वप्ने पूर्ण करणे ही मोठी प्राणशक्ती आहे. जेव्हा स्वप्ने मोठी होतात, जेव्हा विचार मोठे असतात तेव्हा प्रयत्नही खूप मोठे असतात.